Bull Competition  Dainik Gomantak
गोवा

मांद्रेत उधळल्या बैलांच्या झुंजी

पोलिसांची कारवाई: नाईक यांच्‍या बदलीसाठी राजकीय ‘वजन’

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे मतदारसंघात आज शनिवारी आयोजित बैलांच्या झुंजी पेडणेचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी उधळून लावल्याबद्दल त्यांची बदली अटळ असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचा वाढदिवस असल्याने काही धिरयोप्रेमींनी चार बैलांच्या झुंजी विविध ठिकाणी आयोजित केल्या होत्या. त्याचा सुगावा नाईक यांना आदल्‍या दिवशी रात्री लागल्यानंतर त्यांनी झुंजीत सामील होणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

पोलिस निरीक्षक नाईक यांनी सध्या पेडणे तालुक्यातील बेकायदा रेतीव्यावसायिकांच्या होड्यांवर कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे. शिवाय जुगाराचे अड्डेही बंद केले आहेत. आता बैलांच्या झुंजी आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असताना, त्या त्‍यांनी उधळून लावल्यामुळे काही राजकारण्यांचे समर्थक आणि राजकारणीही संतापलेले आहेत. त्यामुळेच नाईक यांची बदली अटळ असल्याचे बोलले जात आहे. नाईक यांच्‍या बदलीसाठी पेडणे तालुक्यातील राजकारण्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत आपले वजन वापरण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, नाईक यांची राजकीय सुडबुद्धीने बदली केल्यास पेडणे तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा पेडणे तालुका विकास समितीचे अध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

Goa Politics: म्हापशातील प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; विकास ठप्प, सत्ताधाऱ्यांनी विकासाऐवजी केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT