Valpoi Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : लेखनातूनच व्यक्तिमत्त्वाची ओळख : माधव गाडगीळ

Valpoi News : प्रतिबिंब, तुळशीपत्र पुस्तकांचे प्रकाशन

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News : वाळपई , समाजामध्ये असलेली अनेक पात्रे ही मरणानंतरही जिवंत राहतात. त्यांच्या संबंधित लेखनातून त्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. ती पात्रे जिवंत राहतात.

पुस्तक हे प्रत्येकाच्या आठवणी जिवंत व कायम सोबत करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे, असे मत माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

संजीव बर्वे यांच्या ‘प्रतिबिंब’ या व्यक्तिचित्र व ‘तुळशीपत्र’ या नाटकाच्या पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते. ब्रह्मकरमळी येथील ब्रह्मदेव देवस्थानामध्ये नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

व्यासपीठावर नगरगाव पंचायतीच्या सरपंच संध्या खाडिलकर पंच राजेंद्र अभ्यंकर, निवृत्त शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गाडगीळ, ‘गोमन्तक’ टीव्हीचे उपसंपादक विश्वनाथ नेने, वाळपईचे भाग शिक्षणाधिकारी भालचंद्र भावे, श्रीरंग बर्वे, प्रसाद खाडीलकर व इतरांची उपस्थिती होती.

माधव गाडगीळ पुढे म्हणाले, प्रत्येकाने पुस्तक वाचने अत्यंत गरजेचे आहे. पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानात भर पडत असते. मात्र व्यक्तिचित्रांतून प्रत्येकाच्या आठवणी जिवंत होत असतात. यामुळे संजू बर्वे यांनी लिहिलेले ''प्रतिबिंब’ हे पुस्तक येणाऱ्या काळासाठी प्रत्येकाच्या स्मरणात राहणार आहेत. या पुस्तकातून विविध विचार व्यक्त झाले आहेत.

पत्रकार विश्वनाथ नेने म्हणाले, पुस्तकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व्यक्तींचे चित्रण वाचकांसमोर समर्थपणे उभे केले आहे. ही एक चांगल्या प्रकारची संकल्पना असून ती कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या माध्यमातून लेखन करण्याचा प्रयत्न करावा. त्यातून प्रत्येकामध्ये आत्मविश्वास वाढविण्याची प्रक्रिया जन्माला येत असते व त्यातून चांगल्या प्रकारचे पुस्तक जन्माला येऊ शकते.

संजीव बर्वे म्हणाले, ‘तुळशीपत्र’ या नाटकाचे लेखन करताना अनेक स्तरावर माहितीचा आधार घ्यावा लागला. यामुळे चांगल्या पद्धतीने हे नाटक समाजासमोर निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

बर्वेंचे शैलीदार लेखन

सरपंच संध्या खाडिलकर म्हणाल्या, बर्वे हे निसर्गाच्या सानिध्यात राहणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी आयुष्यात आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आलेल्या व्यक्तींची व्यक्तिचित्रे चितारण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांनी लिहिलेले ‘तुळशीपत्र’ हे नाटक समाजाला पोर्तुगीज व ब्रिटिश राजवटीतील कठीण काळाची आठवण करून देते. त्यांच्या लेखनातून अनेक व्यक्तिमत्त्व समर्थपणे वाटचाल करताना दिसतात. त्यांच्या लेखनात एक वेगळी शैली असून ती वाचकांना भावते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीला काळिमा! छत्तीसगडमध्ये 19 वर्षीय तरुणीवर 5 जणांचा सामूहिक अत्याचार; पोलीस हेल्पलाइनचा ड्रायव्हरच निघाला नराधम

Viral Video: "मग आम्ही काय पाकिस्तानी आहोत का?", काश्मिरी माणसानं पर्यटकाला दिलं झणझणीत उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

लोकहितासाठी सरकार मागे हटण्यासही तयार! आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे- श्रीपाद नाईक

Lucky Gemstones: ग्रहांच्या 'बॅटिंग'वर तुम्ही मारणार सिक्सर! कामात फोकस आणि नफ्यात वाढ देणारी 5 लकी रत्ने; करिअरच्या मैदानात आता तुम्हीच ठरणार मॅन ऑफ द मॅच

मोपा विमानतळावर 3.16 कोटींचे अमली पदार्थ जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT