Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: वास्कोतील मानवी तस्करीप्रकरणी तिसऱ्या संशयिताला अटक; नोकरीचे आमिष देऊन महिलेची केली होती फसवणूक

Vasco Crime News: वास्कोतील मानवी तस्करीप्रकरणी अक्रम अली शेख या तिसऱ्या संशयिताला चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

Vasco Human Trafficking Case

पणजी : वास्कोतील मानवी तस्करीप्रकरणी अक्रम अली शेख या तिसऱ्या संशयिताला चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या वतीने अरुणेंद्र पांडे (संस्थापक आणि संचालक, अर्ज) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तस्करीची घटना १९ ते २८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडली होती. या काळात सय्यद अब्दुल्ला शेख आणि मस्तान खान ऊर्फ पठाण यांनी पीडितेला मस्कत येथे घरकामाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि तेथे पोहोचल्यावर वेतन दिले जाईल, असे सांगितले.

परंतु, या दोघांनी फसवणूक करून पीडितेला मस्कत येथे पाठविले व एका फ्लॅटमध्ये अन्य ११ भारतीय महिलांसोबत ठेवले, जिथे योग्य अन्न व निवासाची सुविधा नव्हती.

त्यानंतर इतर आरोपींच्या मदतीने पीडितेला एका शेखच्या घरी कामासाठी पाठविण्यात आले. तिथे तिच्यावर लैंगिक शोषणासाठी दबाव टाकण्यात आला. सध्या दोघे संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT