High Court of Bombay at Goa
High Court of Bombay at Goa Dainik Gomantak
गोवा

Dona Paula : दोना पावला येथील त्या कॉलनीला प्रतिदिन तीन तास पाणीपुरवठा करा!

दैनिक गोमन्तक डिजिटल

दोना पावला येथील ला ओशियाना कॉलनीतर्फे पाणीटंचाई समस्येसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला पाठविलेल्या पत्राची स्वेच्छा दाखल घेण्यात आली आहे. त्यावर या कॉलनीत तसेच अशाच प्रकारची समस्या असलेल्या इतर परिसरांतही दिवसाला दररोज किमान तीन तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा आदेश गोवा खंडपीठाने सरकारला दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 मे रोजी ठेवली आहे.

घटनेच्या कलम 21 नुसार लोकांना स्वच्छ व आरोग्यदायी जीवनासाठी मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करायला हवा. ज्या भागात पाणीटंचाई आहे, तेथे मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात ॲडव्होकेट जनरल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला योग्य त्या सूचना कराव्यात.

राज्यातील पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी सरकारने केलेल्या उपायांची माहिती पुढील सुनावणीवेळी द्यावी, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.

पाणीटंचाईची सविस्तर माहिती द्या

पाणी टंचाईसंदर्भात दोना पावला येथील ला ओशियाना कॉलनीतील नागरिकांनी पत्राद्वारे सादर केलेली माहिती ॲडव्होकेट जनरल यांना तसेच ॲमिकस क्युरी म्हणून नियुक्त केलेल्या गौरीश अग्नी यांना देण्यात यावी.

ॲमिकस क्युरी यांनी पुढील सुनावणीवेळी पाणीटंचाई समस्येबाबत सविस्तर माहिती असलेली याचिका सादर करावी. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यांनी याचिकादारांना किमान तीन तास पाणी द्यावे, असा निर्देश गोवा खंडपीठाचे सुट्टीकालीन न्यायमूर्ती रोहित देव यांनी दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

SCROLL FOR NEXT