Gujarat governor Acharya Devvrat Dainik Gomantak
गोवा

Governor Devvrat: रासायनिक शेतीमुळे उत्तर भारत विनाशाकडे जातो आहे

राज्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज

दैनिक गोमन्तक

पणजी: गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यात सेंद्रिय शेतीची गरज असल्याचे म्हटले आहे. नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे ते म्हणाले. राज्यपाल देवव्रत गोवा कृषी संचालनालयाने राजभवनात एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलत होते.

(Gujarat governor Acharya Devvrat said must goa farmers organic farming )

गुजरात राज्यपाल देवव्रत (Gujarat governor Acharya Devvrat )हे सेंद्रिय शेतीचे समर्थक आहेत. तसेच अभ्यासक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी सांगितले की, सेंद्रिय शेतीची ( organic farming ) संकल्पना गतीमान करण्यासाठी आणि कृषी विस्तारक, शेतकरी समुदाय यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना मिळणे आवश्यक आहे.

आपलं उदाहरण देत देवव्रत म्हणाले “माझ्याकडे हरियाणामध्ये 200 एकर जमीन आहे. जिथे नव नवे प्रयोग करत असतो. जगभरातील शास्त्रज्ञ म्हणतात की रासायनिक शेती 24% ग्लोबल वार्मिंगसाठी जबाबदार आहे आणि 0.5% पेक्षा कमी कार्बनिक कार्बन जमिनीसाठी हानिकारक आहे. परिणामी, रासायनिक शेतीमुळे उत्तर भारत विनाशाकडे जात आहे.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गोवावासीयांनी आपल्या मुळ शेतीकडे परतण्याची गरज असून आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा यातुन दुग्धव्यवसाय, फलोत्पादन, मत्स्यपालन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रगतीसाधला येईल. तसेच हळूहळू कमी होत असलेल्या हिरव्या भाज्यांच्या देशी प्रकारांसह स्वतःचे पीके वाढवण्यावर लक्ष केंद्रित केल्यास फलोत्पादन महामंडळ भाजीपाल्यांसाठी इतर राज्यांवर अवलंबून राहणे थांबवू शकते अन् गोवा याबाबतीत स्वावलंबी होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT