पणजी: राज्यात हवामान विभागानं (IMD) उद्यापासून (१ एप्रिल) पुढील ३ दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या कालावधीत काही भागात हलक्या ते मध्यम शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हलक्या ते मध्यम पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. राज्याच्या उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये या हवामान बदलांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गोव्यात मार्च ते मे या कालावधीत काजू आणि आंबा पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड आणि उत्पादन होतं. मात्र, हवामान बदलामुळं अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम काजू, आंबा पिकांवर होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी, सत्तरीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं कहर केला होता. खोतोडा, कुंभारखणसह सत्तरीतील इतर भागात मुसळधार पाऊस पडला होता. या पावसामुळं सत्तरीतील काही भागात पडझडीच्या घटनांसह वीजपुरवठाही खंडित झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.