Jail  Dainik Gomantak
गोवा

जामिनावर सुटल्यानंतर 3 दिवसात परत गजाआड; म्हापसा पोलिसांची कारवाई

पोलिसांच्या पथकाने विश्वसनीय माहिती मिळवली आणि तीन आरोपींना म्हापसा येथे पकडले.

दैनिक गोमन्तक

म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातून तीन दिवसांपूर्वी जामिनावर सुटलेल्या तीन आरोपींनी म्हापशात परत चोरी केली. यावेळेस त्यांनी म्हापसा येथील एका खाजगी इमारतीत असलेल्या कार्यालयातून तीन मोबाईल फोन आणि 70 हजारांची रोकड लंपास केली. म्हापसा पोलिसांनी तिघांना परत अटक केली आहे. (goa police arrested thieves in Mapusa)

पोलिसांनी रमेश वडार (37), संजय बने (26), मोहम्मद शेख (28, सर्व मूळ कर्नाटक) यांच्याकडून मोबाईल फोन आणि रोख 16,000 रुपये जप्त केले आहेत. गुरूवारी म्हापसा येथील एका खाजगी कार्यालयातून व इतर तीन कार्यालयांतून चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान, पोलिसांच्या पथकाने विश्वसनीय माहिती मिळवली आणि तीन आरोपींना म्हापसा येथे पकडले. चौकशीत या तिघांनी चोरीत आपला सहभाग असल्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारची चोरीची घटना एका खाजगी इमारतीत घडली होती, या तिघांनीच ती केली असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी म्हापसा पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT