Traffic Rule Dainik gomantak
गोवा

New Traffic Rule : गोयकारांनो जाणून घ्या नवा वाहतूक नियम

आधी जनजागृती, नंतर अंमलबजावणी; एक हजार रुपये दंड : अधीक्षक सिल्वा

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यात गेल्या 20 दिवसांत दुचाकीवरील 7 सहचालकांचा अपघाती मृत्यू झाल्याने वाहतूक पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.

मोटार वाहन कायद्यात दुचाकीवरील दोघाही स्वारांना हेल्मेटची सक्ती आहे. त्यामुळे या कायद्याबाबत दुचाकीस्वारांमध्ये काही दिवस जनजागृती करून त्याची अंमलबजावणी 15 दिवसांनंतर करण्याचा विचार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक बॉस्युएट सिल्वा यांनी दिली.

हल्लीच झालेल्या अपघातातील सात प्रकरणांमध्ये दुचाकीस्वाराने हेल्मेट घातल्याने तो बचावला, तर मागे बसलेले त्याचे नातेवाईक किंवा मित्र यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता दुचाकीवरील सहचालकालाही हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

सुरुवातीला काही दिवस त्याबाबत जनजागृती केली जाईल. दुचाकीस्वारांना त्याचे महत्त्व पटवून दिले जाईल, असे सिल्वा यांनी सांगितले.

काय आहे वाहतूक नियम?

दुचाकी चालवणारा आणि त्याच्या पाठीमागे बसणाऱ्या सहचालकानेही हेल्मेट परिधान करणे हे वाहन कायदा 1988 कलम 126 सह 194 (ड) अन्वये बंधनकारक आहे. विनाहेल्मेट मोटारसायकल चालविल्यास नवीन वाहन कायद्यानुसार 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित केला जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT