Virdi Dam Dispute Gomantak Digital Team
गोवा

Virdi Dam Dispute: विर्डी’चा ‘वाळवंटी’च्या अस्तित्वाला धोका

महाराष्ट्राकडून धरणाचा ‘घाट' : डिचोलीसह राज्याला जलसंकटाची भीती; ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण

गोमन्तक डिजिटल टीम

Virdi Dam Dispute: कर्नाटक सरकारने ‘म्हादई’वर घाला घातला असतानाच, आता म्हादईची उपनदी असलेल्या ‘वाळवंटी’ नदीवरही संकट येण्याची भीती वाढली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि दोडामार्ग तालुक्यातील विर्डी येथे वाळवंटी नदीवर धरण बांधण्याचा महाराष्ट्र सरकारचा घाट सुरू आहे. सध्या प्राथमिक टप्प्यातील कामही सुरू असल्याची माहिती आहे.

हे धरण झाल्यास साखळीतून वाहणाऱ्या ‘वाळवंटी’च्या अस्तित्वाला प्रचंड धोका निर्माण होणार असून, सत्तरी आणि डिचोली तालुक्यासह राज्यावर मोठे जलसंकट ओढवण्याची नामुष्की येणार आहे.

आधीच ‘म्हादई’ जवळपास हातातून निसटल्यातच जमा असल्याने राज्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

परवानगी आवश्‍यक

‘म्हादई’चे पाणी तापले आहे. गोव्यातील जनतेला ‘म्हादई’ची चिंता सतावत आहे. केंद्रीय जलआयोगाची परवानगी नसताना विर्डी धरणाचे काम करता येणार नाही, असा जलस्रोत खात्याचा दावा आहे.

तरीदेखील कर्नाटक सरकारची हेकेखोरी पाहता, कर्नाटकच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र सरकारकडून वाळवंटी नदीवर विर्डी येथे धरण बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे ‘वाळवंटी’च्या अस्तित्वालाही आता धोका निर्माण झाला आहे.

सरकारने पावले उचलावीत

विर्डी येथे धरण झाल्यास सत्तरी, डिचोलीसह उत्तर गोव्यात पाण्याचा दुष्काळ निर्माण होणार आहे. तशी भीतीही पर्यावरणप्रेमी आणि जागृत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

राज्याचे अस्तित्व आणि भविष्यातील पाण्याची गरज ओळखून म्हादईसह वाळवंटीचे रक्षण करण्यासाठी सरकारने गांभीर्याने पावले उचलावीत, अशी मागणी शैलेश फातर्पेकर आदी डिचोलीतील जनतेकडून होत आहे.

जलप्रक्रिया प्रकल्पावर परिणाम

आधीच डिचोली तालुक्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. कर्नाटकातील कळसा-भांडुरा प्रकल्पानंतर आता विर्डी धरणाचे संकट उभे ठाकले आहे.

विर्डी धरण झाल्यास पाणीपुरवठा करणाऱ्या साखळीसह पडोसे आणि उत्तर गोव्यातील पाणी प्रकल्पांवर विपरीत परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मवाळ धोरण कारणीभूत

राज्य सरकारच्या मवाळ धोरणामुळे आणि कमकुवत नेतृत्वामुळे राज्याच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘म्हादई’वर कर्नाटक सरकारने घाला घातलाय. आता वाळवंटीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारच्या उचापती सुरू झाल्या आहेत.

हा प्रकार म्हणजे सरकारची अनास्था आहे. वेळीच रोखला नाही, तर काही वर्षांनी गोव्यावर जलसंकट कोसळणार आहे.

रमेश गावस, पर्यावरणप्रेमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT