Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravi Naik On Sunburn Festival 2025: गेल्या 17 वर्षांपासून राज्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला 'सनबर्न फेस्टिव्हल' मुंबईत हालवण्यात आल्याच्या घोषणेने गोव्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Manish Jadhav

पणजी: गेल्या 17 वर्षांपासून राज्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला 'सनबर्न फेस्टिव्हल' (Sunburn Festival) मुंबईत हालवण्यात आल्याच्या घोषणेने गोव्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला काही नेते आणि व्यावसायिक या निर्णयामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्याचे मंत्री रवी नाईक (Ravi Naik) यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले. सनबर्न गोव्यातून बाहेर पडल्याने 'बरे झाले' अशी प्रतिक्रिया देत त्यांनी यामुळे गोव्याची संस्कृती जपली जाईल असे म्हटले आहे.

मंत्री रवी नाईक यांची भूमिका

दरम्यान, मंत्री नाईक यांनी सनबर्नच्या स्थलांतरावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. नाईक म्हणाले की, "सनबर्न फेस्टिव्हलमुळे गोव्यामध्ये (Goa) एक विशिष्ट प्रकारची 'ड्रग संस्कृती' (Drug Culture) वाढत होती. अशा गोष्टी आपल्या राज्याच्या संस्कृतीला आणि परंपरांना शोभणाऱ्या नाहीत." नाईक यांच्या मते, गोवा हे शांत पर्यटन स्थळ आहे, जिथे लोक निसर्गाचा आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी येतात, मात्र सनबर्नसारख्या मोठ्या आवाजाच्या आणि गर्दीच्या फेस्टिव्हलमुळे राज्याची शांतता भंग होत होती.

"आता सनबर्न गोव्यात होणार नसल्याने, आपली संस्कृती आणि परंपरा सुरक्षित राहतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाईक यांची ही प्रतिक्रिया गोव्यातील एका मोठ्या वर्गाच्या भावना व्यक्त करणारी आहे.

आमदार मायकल लोबो यांची वेगळी भूमिका

एकीकडे मंत्री रवी नाईक यांनी या निर्णयाचे स्वागत केले असताना, दुसरीकडे आमदार मायकल लोबो (Michael Lobo) यांनी यावर वेगळी भूमिका घेतली आहे. लोबो यांनी सनबर्नला पुन्हा गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्टपणे म्हटले. लोबो म्हणाले की, "सनबर्न गोव्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते." लोबो यांनी मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांनीही यामध्ये लक्ष घालून सनबर्नला परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

सनबर्न आणि गोव्यातील जुना वाद

मागील काही वर्षांपासून सनबर्न फेस्टिव्हलला स्थानिक गोमंतकीय कडाडून विरोध करत आहेत. प्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनामुळे अनेकदा स्थानिकांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे मंत्री रवी नाईक यांची प्रतिक्रिया या जुन्या वादाची आठवण करुन देते.

दुसरीकडे, सनबर्न गोव्यातून बाहेर पडल्यामुळे आता राज्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असलेले असे भव्य कार्यक्रम आणायचे की, राज्याची सांस्कृतिक ओळख जपायची, यावर आता गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New GST Rate: जीएसटी कॉन्सिलचा मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के दोनच कर; काय होणार स्वस्त? वाचा सविस्तर

Goa Politics: 'मग तुम्हीच तो DPR जनतेसमोर आणा!’ मुरगाव बंदरातील कोळसा वाहतुकीवरुन अमित पाटकरांचं सुदिन ढवळीकरांना थेट आव्हान

Viral Video: व्हायरल होण्याचा हव्यास ‘आंटींला' पडला भारी, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले,'हे रिलवाले...'

Mumbai Goa Highway: “एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं…”; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवर इन्फ्लुएन्सरने मांडली व्यथा VIDEO

शारदीय नवरात्रीतून मिळतायत 'हे' शुभसंकेत, देवीचे वाहन ठरवणार तुमचं भाग्य; वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT