पणजी: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घरांवर, वीजवाहिन्यांवर झाडे कोसळणे, रस्त्यांवरील अडथळे तसेच जनावरे अडकण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन व आपत्कालीन सेवा दल अधिक सतर्क झाले आहे.
मागील १५ दिवसांत अग्निशमन दलाला एकूण ६३५ कॉल्स प्राप्त झाले असून, त्यापैकी सुमारे ५१८ कॉल्स हे पाऊस आणि हवामानाशी संबंधित घटनांचे होते. या घटनांपैकी सुमारे ९० टक्क्यांहून अधिक प्रकरणे झाडांची पडझड आणि संबंधित आपत्कालीन परिस्थितीची होती.
दलाने वेळेवर प्रतिसाद देत विविध भागांतील घटनांवर नियंत्रण मिळवत सुमारे १ कोटी ४५ लाख रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता वाचवली, तर पावसामुळे सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी झाडे वीजखांबांवर कोसळल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला, तर रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले. काही ठिकाणी विहिरीत व्यक्ती पडणे तसेच नैसर्गिक अडथळ्यांच्या घटनाही नोंदविल्या गेल्या. अशा प्रत्येक घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.