Goa Dams Dainik Gomantak
गोवा

Goa Water Crisis: गोव्यातील बहुतांश धरणातील पाण्याची पातळी 40 टक्क्यांच्या खाली, पण सरकार म्हणतंय, 'पिण्याच्या पाण्याची चिंता नको'

Goa Government Water Assurance: गोव्याच्या बहुतांश धरणांमधील पाण्याची पातळी 40 टक्क्यांच्या खाली गेली असतानाही, राज्य सरकारने नागरिकांना खात्री दिली आहे की उन्हाळ्याच्या कडाक्याच्या महिन्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही.

Manish Jadhav

पणजी: गोव्याच्या बहुतांश धरणांमधील पाण्याची पातळी 40 टक्क्यांच्या खाली गेली असतानाही, राज्य सरकारने नागरिकांना खात्री दिली आहे की उन्हाळ्याच्या कडाक्याच्या महिन्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही.

जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी जनतेला आश्वस्त करत सांगितले की, सध्या उपलब्ध असलेले पाणी गोव्याच्या पिण्याच्या पाण्याच्या (Water) गरजा भागवण्यासाठी पुरेसे आहे. “सध्या आमच्याकडे असलेले पाणी 150 दिवसांसाठी पुरेसे आहे. पुढील किमान तीन महिने तरी चिंता करण्यास काहीही कारण नाही,” असे त्यांनी सांगितले.

शिरोडकर यांनी स्पष्ट केले की, सरकार (Government) परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि गरज भासल्यास आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सज्ज आहे. तसेच प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून हवामानात बदल होताना उष्णतेने कहर केला असला, तरी धरणातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. गेल्यावर्षी चांगला मोसमी पाऊस पडल्यानंतर आमठाणे धरणातील जलसाठ्याची पातळी समाधानकारक होती. गेल्यावर्षी पावसाळ्यात हे धरण दोन वेळा तुडुंब भरले होते. दरवर्षी साधारण एप्रिल-मे महिन्यात धरणातील जलसाठ्यात घट होऊन सभोवतालचे पात्र कोरडे पडत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT