CM Pramod Sawant on Tilari project  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: तिलारी प्रकल्पातील 22 कुटूंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी; प्रत्येकी 5 लाख रूपये देणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: तिलारी पाटबंधारे प्रकल्पातील त्या 22 प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्या कुटूंबांना प्रत्येकी 5 लाख रूपये देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

तिलारी पाटबंधारे आंतरराज्य प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाची (Interstate Control Board Tillari Irrigation Project) आज, शनिवारी मुंबईत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर आणि मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते. मुंबईत ही बैठक झाली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत कालव्यांची देखभाल, दुरूस्ती करण्याबाबत विविध मुद्यांवर मतैक्य झाले आहे. 22 कुटूंबांच्या पुनर्वसनाचा मुद्दा प्रलंबित होता.

तो मुद्दाही सोडविण्यात आला आहे. प्रत्येक कुटूंबाला प्रत्येकी 5 लाख रूपये दिले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, याच बैठकीवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोवा-महाराष्ट्र हे भावासारखे असून म्हाईद पाणी वाटपाच्या लढ्यात कर्नाटकविरोधात महाराष्ट्र आणि गोवा एकत्र लढतील, असे वक्तव्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT