पणजी: राज्यात नारळ आणि काजू यासोबतच केळ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ५० टक्के केळी लागवड ही बागायती पिकांमध्ये अंतर्गत पीक म्हणून केली जाते. माड, पोफळी आणि इतर बागायती पिकांमध्येही केळींची लागवड देखील होते.
राज्यातील एकूण उत्पादनाचा आढावा घेतल्यास सत्तरी (Sattari) तालुक्यात सर्वाधिक ५ हजार ९८३ टन इतके उत्पादन घेण्यात येते. राज्यात एकूण २,५१० हेक्टर क्षेत्रफळात केळी लागवड करण्यात आली असून राज्यात सुमारे २९ हजार ७०५ टन इतके केळीचे उत्पादन घेण्यात येते; परंतु याहून कित्येक अधिक पट केळी शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातून आयात केली जातात.
सत्तरी तालुक्यानंतर सर्वाधिक केळी उत्पादन हे केपे तालुक्यात ५,८५८ टन उत्पादन घेण्यात आले आहे. केपेतील ५२८ हेक्टर क्षेत्रफळ केळी लागवडीखाली आहे. फोंड्यात ४,५०८ टन, डिचोलीत ३,६०० टन, तिसवाडीत ३६० टन, बार्देशात १,२७३ टन, पेडणेत ९२१ टन, सांगेत २,०२५ टन, धारबांदोड्यात १,०१४ टन, काणकोणात २,७४२, सासष्टीत १,०८२ आणि मुरगाव येथे ३३९ टन इतके केळीचे उत्पादन घेण्यात आले.
राज्यात कांदे आणि टोमॅटोच्या दरात वाढ झाली असून पणजी बाजारात कांदे ४० रुपये तर टोमॅटो ५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. इतर पालेभाज्या पन्नास रुपयांना ३ जुड्या दराने विकल्या जात आहेत.
पणजी (Panaji) बाजारात कोबी ५० रुपये किलो, गाजर ८० रु., हिरवी मिरची ८० रु., भेंडी ८० रु. दराने विकली जात आहे. आले २०० ते २५० रुपये आणि लसूण ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. मक्याची कणसे शंभर रुपयांना पाच नग, रताळी ६० रु. किलो, शेंगा १०० रु. किलो दराने विकल्या जात असून सध्या फळांच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.