Goa नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या बैठकीत उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर , बाजूला आरजीआय संस्थेचे प्रमुख विवेक जोशी, डॉ जानू झोरे, एन डी अगरवाल, चंद्रकांत शिंदे, राजशेखर रेड्डी व इतर अधिकारी Dainik Gomantak
गोवा

गवळी, धनगर समाजाला 'अनुसूचित जमातीचा' दर्जा मिळवून देणार का; बाबू कवळेकर

मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या राज्यातील गवळी, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा समाजाचे नेते बाबू कवळेकर यांनी पुढाकार घेतला असून, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आज नवी दिल्ली येथील गृहखात्याच्या अतंर्गत येणाऱ्या आरजीआय रजिस्टर जनरल ऑफ इंडिया या संस्थेचे प्रमुख विवेक जोशी व इतर अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी धनगर समाजाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

यावेळी त्यांच्या समवेत राज्यातील आय ए. एस अधिकारी राजशेखर रेड्डी, या विषयी पाठपुरावा करण्यासाठी सरकारने नेमलेले निवृत्त अधिकारी एन डी अगरवाल, समाजाचे डॉ जानू झोरे, चंद्रकांत शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांच्याने केंद्रीय गृह खात्याचे सचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे, या चर्चेत त्यांच्या कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती मिळाली असून त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील गौळी धनगर समाजाला चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT