Manohar Parrikar  Dainik Gomantak
गोवा

'मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर भाजपने पक्षाच्या तत्वांना तिलांजली दिली'

अशी टीका भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य गजानन तिळवे यांनी काल काँग्रेसात प्रवेश केल्यानंतर केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे नेतृत्व करत होते त्यामुळे अधिकाधिक युवा भाजपकडे आकर्षित होत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर भाजपने पक्षाच्या तत्वांना तिलांजली दिली आहे. ज्यांनी भाजप (BJP) तसेच मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी अपमानित केले त्यांना भाजपने जवळ केले आहे, अशी टीका भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य गजानन तिळवे (Gajanan Tilve) यांनी काल काँग्रेसात प्रवेश केल्यानंतर केली. (Gajanan Tilve slams the BJP government and joins Congress)

गजानन तिळवे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आज अधिकृतपणे काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी त्यांना प्रवेश देत स्वागत केले. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat), युवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, अखिलेश यादव तसेच तिळवे यांचे समर्थक उपस्थित होते.

सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही टोकाला जाऊ शकतो आणि या पक्षात आता कोणतीही तत्त्वे राहिलेली नसल्याचा आरोप तिळवे यांनी केला. काहीही करून सत्ता मिळवणे हा भाजपचा हेतू आहे. भाजपमध्ये तत्त्वे नाहीत. हा पक्ष आता बदलला आहे. भाजपात घुसमट होत असल्याने काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मला आशा आहे की, काँग्रेस बहुमताने जिंकेल आणि सरकार स्थापन करील. गेली कित्येक वर्षे शिवोली मतदारसंघ भाजपकडे होता मात्र विकास झालेला नाही. या भागातील टॅक्सी चालकांचे प्रश्‍न भाजप सरकार सोडवू शकला नाही, असे तिळवे म्हणाले.

ॲड. वरद म्हार्दोळकर म्हणाले की, भाजपच्या युवा मोर्चात फॅमिली राज होत असून, त्यामुळे तिळवे यांना भाजपला सोडचिठ्ठी द्यावी लागली. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही ते काँग्रेसमध्ये सामील झाल्याबद्दल पक्षातर्फे त्यांचे अभिनंदन करत आहे.

भाजप सर्वात भ्रष्ट

जानन तिळवे यांच्या प्रवेशाने काँग्रेस पक्ष मजबूत होईल. भाजपमध्ये कोणतीही तत्त्वे नाहीत, नैतिकता नाही आणि ते सर्वात भ्रष्ट सरकार आहे. नोकऱ्यांसाठी तरुणांना लाखो रुपये मोजावे लागत असल्याने भाजप सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे दिसते, असे गुंडूराव म्हणाले.

काँग्रेस हाच पर्याय

भाजपने लोकशाहीची हत्या केल्याचे तरुणांना कळले असून त्यामुळे ते काँग्रेसकडे आकर्षित होत आहेत. विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला नाकारण्याचा निश्‍चय केला आहे. केवळ काँग्रेसच स्थिर सरकार देऊ शकते हे युवांना दिसू लागले आहे. राज्यात काॅंग्रेस हाच पर्याय आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT