Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्‍नी केंद्राकडे पाठपुरावा सुरू - मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचेच सरकार निवडून येईल, असा दावा सावंत यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हादईप्रश्‍नी केंद्र सरकारकडे सक्षमपणे पाठपुरावा करण्यात येत आहे. या लढ्यामध्ये आता महाराष्ट्र राज्याचीही साथ मिळत असल्याने गोवा सरकारच्या वतीने कायदेशीर प्रक्रियेबरोबर राजकीय आणि तांत्रिक आघाड्यांवर मात करत ही लढाई आम्ही जिंकू, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

वास्को येथे भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचेच सरकार निवडून येईल, असा दावा सावंत यांनी केला. या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचवण्याचा संकल्प करण्यात आला.

प्रामुख्याने अंत्योदय तत्त्वावर विकासाची दिशा, आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या तत्त्वानुसार कार्य करण्याचे ठरले असून पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांसह कार्यकर्त्यांनीही या कामी स्वत:ला वाहून घ्यावे, असेही मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले. या बैठकीत महिला आणि युवकांना कौशल्य विकासामध्ये सक्षम करण्यावर भर देण्याचे ठरले असून स्वयंपूर्ण गोव्यासाठी युवक आणि महिलांनी उद्योजकतेकडे वळावे, असे सांगण्यात आले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

US Visa Fraud Case: कॅमेऱ्यासमोर शस्त्राचा धाक, पण सगळं 'फेक'! ग्रीन कार्डसाठी 'डेंजर' जुगाड; अमेरिकन पोलिसांकडून 11 भारतीयांना बेडया

Alphonso Alert: हापूसवर युद्धाचं सावट! मध्यपूर्वेतील संघर्षाचा कोकणच्या आंब्याला फटका; निर्यातीचं गणित बिघडणार

Girdoli: 10 दिवस पाणीपुरवठा ठप्प, विहिरीचे पाणी आटले; संतप्त ग्रामस्थांचा अभियंत्याला घेराव

सूर्य दोनापावला ठिकाणी जुवारीच्या मुखात लांब जात म्हणतो, ‘कदंब, बेतीवरे, पर्वरी, बांबोळी, वेर्णा आणि साकवाळ पठारे म्हातारी झाली’

SCROLL FOR NEXT