Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: स्मार्टसिटीच्या कामांमुळे मंत्रीही वैतागले; पर्यटन मंत्री रोहन खंवटे काय म्हणाले वाचा...

स्मार्ट सिटीची कामे हा महत्वाचा मुद्दा

Akshay Nirmale

Rohan Khaunte: पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनधारकांना तर त्रास होतच आहे, पण लोकप्रतिनिधीही शहरातील रस्तेकामांमुळे त्रासले आहेत. खुद्द पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनीच याबाबत त्यांची व्यथा मांडली आहे.

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, सोमवारपासून सुरवात झाली आहे. त्यापुर्वी पर्यटन मंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना याबाबत मत व्यक्त केले.

गोव्यातील वाहतूक कोंडीला स्मार्ट सिटीची कामे जबाबदार आहेत का, असे विचारले असता मंत्री खंवटे म्हणाले की, स्मार्ट सिटीची कामे हा पणजीतील मोठा मुद्दा बनला आहे. मला स्वतःलाही दुचाकी घेऊन फिरावे लागते. जो त्रास सर्वांना भोगावा लागत आहे तो आमदारांनाही भोगावा लागत आहे, असे ते म्हणाले.

पर्यटक हे आमच्यासाठी अतिथी आहेत. प्रत्येक पर्यटक वाईट नसतो. आणि प्रत्येकवेळी स्थानिकही चुकीचे नसतात. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कारवाईसाठी पोलिस आहेत. पर्यटकांवरील हल्ल्याच्या घटना भविष्यात घडू नयेत. पर्यटन क्षेत्रातील बेकायदा गोष्टी अजिबात मान्य करणार नाही. बेकायदा टॉवर्सना विरोध आहे गोवेकरांची कमाई व्हावी, त्यांनी चांगले कमवावे, असाच आमचा हेतू आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT