Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट रोज 6 तासांसाठी राहणार बंद

परशुराम घाट विभाग 27 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान दररोज सहा तास बंद राहणार आहे.
Mumbai-Goa Highway Work
Mumbai-Goa Highway Work Dainik Gomantak

Mumbai-Goa Highway Work : मुंबई-गोवा महामार्ग हा आपल्या देशातील रखडलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. मागील अनेक वर्षांपासून याचे काम पूर्ण झालेले नाही. याबाबत मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, चिपळूण, रत्नागिरी येथील मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट विभाग 27 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान दररोज सहा तास बंद राहणार आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 6 या कालावधीत हा विभाग बंद राहणार आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी हे केले जात आहे. या काळात वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात येणार आहे.

Mumbai-Goa Highway Work
Panaji Municipal Corporation : पणजी महानगरपालिकेचे अंदाजपत्रक आज

परशुराम घाट विभागाची लांबी सुमारे 5.40 किमी आहे. आतापर्यंत 4.20 किमी महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून, हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, परशुराम घाटाच्या उर्वरित 1.20 किमी लांबीचे काम अजून अपूर्णच आहे. डोंगराळ भागामुळे त्या भागाचे काम थोडे आव्हानात्मक आहे.

काही वेळा या भागात अवकाळी पावसात भूस्खलनाच्या घटना घडतात. रस्त्याच्या कामात डोंगराच्या 25 मीटरपर्यंत खोदकाम केले जाईल. खोदकाम सुरू असताना महामार्गावर दगड आणि माती पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. महामार्गाचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून राज्य PWD-राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत राबविण्यात येत आहे. महामार्ग बंद करण्यासाठी ठेकेदाराने अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com