Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: शैक्षणिक बदल! राज्यात यंदापासून अकरावी, बारावीचे विभाग रद्द

Goa Education: राज्य सरकारचा निर्णय : कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक विभागांऐवजी आता विषय संच

दैनिक गोमन्तक

Goa Education:

राज्य सरकारने आज घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावी-बारावीसाठीचे विभाग रद्द करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे उच्च माध्यमिक स्तरावर कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक या विभागांऐवजी आता विषय संच असतील.

यंदा अकरावीतून बारावीत जाणाऱ्यांसाठीही हा बदल लागू होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सायंकाळी उशिरा मंत्रालयात पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, पुढील उच्च शिक्षणासाठीचा प्रवेश हा विषयावर आधारित दिला जातो.

त्यामुळे उच्च माध्यमिक स्तरावर विषयांची निवड करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात बारावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण होणारे हे केवळ बारावी उत्तीर्ण असतील. ते बारावी कला, बारावी वाणिज्य, बारावी विज्ञान किंवा बारावी व्यावसायिक, असे नसतील.

जूनमध्ये निवडता येणार विषय

यंदा जूनमध्ये दिल्या जाणाऱ्या अकरावी आणि बारावी प्रवेशावेळीच विद्यार्थ्यांना विषय संच निवडण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांना आपले उच्च शिक्षण कोणत्या विषयात पुढे न्यायचे आहे, तो विषय त्यांना प्रमुख म्हणून घेता येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये तशी तरतूद असून राज्य सरकारने ती यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच लागू करण्याचे ठरविले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT