साळ: दोडामार्ग ते अस्नोडा या मुख्य रस्त्यावर भूमिगत वीजवाहिन्या व जलवाहिनी घालण्यासाठी खोदकाम करून वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र खोदकामातून निघालेला मातीचा भराव रस्त्यावरच असल्याने तो वाहतुकीस धोकादायक ठरत आहे.
विशेषतः नानोडा परिसरातील रस्त्यावर हा भराव अधिक प्रमाणात असून तो अपघातांना निमंत्रण देत आहे. या मार्गावरून वाहने चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही महिन्यांपूर्वी येथे वाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
वाहिन्या टाकल्यानंतर रस्त्यावरील अतिरिक्त मातीचा भराव हटवणे आवश्यक होते; परंतु तो अद्याप रस्त्यावरच असल्याने वाहनांना बाजू देताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच अनेकदा अपघातासारखे प्रसंग उद्भवत आहेत. पावसाळ्यात हा भराव अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यावरील हा भराव तातडीने हटवावा, अशी मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.