पणजी: काँग्रेस नेत्यांनी एकजुटीने काम करण्याचा संदेश देण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतच नेत्यांमधील प्रखर मतभेद उघड झाले. तब्बल दीड वर्षाने काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्याची आठवण का झाली, अशी जोरदार विचारणा यावेळी करण्यात आली. मागील बैठकीत घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी आणि या बैठकीसाठी सुचविलेले भलतेच विषय यावरून अनेकांनी प्रभारी आणि पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.
काँग्रेसचे राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे, सचिव प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर (Amit Patkar) उपस्थित होते.
माणिकराव ठाकरे यांनी या बैठकीत निवडणूक (Election) तयारीवर भर दिला. जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. अंजली निंबाळकर यांनी सक्रिय कार्यकर्त्यांच्या मतदारसंघांची यादी तयार केली असून न पोहोचलेल्या मतदारसंघांना लवकरच त्या भेट देणार आहेत.
एल्विस गोम्स
दीड वर्षानंतर कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकालाच काही ना काही समस्या आहेत आणि त्या मांडताना चर्चा होणारच.
माझ्या विषयांवर चर्चा करण्याची मला संधी मिळाली नाही. कारण माझ्यापेक्षा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपले मुद्दे मांडले. दीड वर्षांनंतर बैठक झाल्यामुळे नाराजी साहजिकच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.