Goa Coconut Price Hike Dainik Gomantak
गोवा

Goa Coconut Market: नारळ स्वस्त होईना! दर गगनाला भिडले; वाढत्या महागाईने गोमंतकीय हैराण

Goa Coconut Price Hike: गेल्या दीड-दोन महिन्यांपासून नारळ भाव खात आहेत. चतुर्थीवेळी काहीसे स्वस्त झालेल्या नारळांच्या दरात चतुर्थीनंतर हळूहळू वाढ होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: दैनंदिन आहारातील मुख्य घटक असलेला नारळ काही केल्या स्वस्त होईना. उलट दर वाढतच आहेत. नारळ आता आणखी महाग झाल्याने सामान्य ग्राहकांच्या कपाळाला आठ्या पडू लागल्या आहेत.

गेल्या दीड-दोन महिन्यांपासून नारळ भाव खात आहेत. चतुर्थीवेळी काहीसे स्वस्त झालेल्या नारळांच्या दरात चतुर्थीनंतर हळूहळू वाढ होत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत नारळांच्या दरात आकारानुसार प्रती नगामागे आणखी किमान ५ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे. डिचोलीच्या बाजारात नारळांचे दर सध्या प्रती नग ५० रुपयांपर्यंत पोचले आहेत.

नारळांचे दर वाढल्याने आधीच महागाईमुळे त्रस्त झालेली सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. दैनंदिन आहाराबरोबरच धार्मिक कार्यासाठी नारळांना मागणी असते. उत्पादनातील घट यामुळे बाजारात नारळांची कमतरता दिसून येत आहे.

उत्पादनात घट

गेल्या काही वर्षांपासून रोग आदी पादुर्भावामुळे नारळ उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. यावर्षी मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यंदा नारळ उत्पादनात जवळपास ४० टक्के घट झाली आहे. अशी माहिती बागायतदारांकडून मिळाली आहे. तापमानात झालेली वाढ, त्यातच असंतुलित पावसाच्या माऱ्यामुळे नारळांच्या पिकावर परिणाम झाला आहे, अशी माहिती बागायतदारांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT