CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: गोवा कोकणी अकादमीसाठी लवकरच इमारत -मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

Pramod Sawant: कोकणी भाषेच्या क्षेत्रात जे कार्य सुरू आहे, ते जगभरातील कोकणी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी कोकणी विश्र्व संमेलनाचे आयोजन होणे गरजेचे आहे. हे संमेलन गोव्यात आयोजित करण्यास सरकार सर्वतोपरी सहकार्य करील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळुरू येथे केली.

विश्र्व कोकणी केंद्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. गेल्या चार वर्षांत गोव्यात कोकणीसाठी जरी मोठे काम होऊ शकले नसले, तर लवकरच कोकणी अकादमीसाठी इमारत उभारली जाईल. येथे कोकणीच्या विकासासाठी लागणारी साधनसुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे ते म्हणाले.

इतर राज्यांतही कोकणीची रुजवण

कोकणी भाषेची रुजवण इतर राज्यांतील लोकांमध्ये झाली पाहिजे. त्यातून कोकणी भाषिक एकत्र येतील व भाषेच्या विकासासह संस्कृतीच्या विकासालाही हातभार लागेल.

सर्व कोकणी भाषिकांनी आपसांत कोकणी बोलावी, लिहावी व वाचावी, जेणेकरून पुढील पिढीमध्ये कोकणीबद्दल प्रेम निर्माण होईल व कोकणीचे संवर्धनही होऊ शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नाटक, सिनेमांद्वारे कोकणीचा विकास

कोकणीचा आठव्या परिशिष्टात समावेश झाल्याने तिला राष्ट्रीय ओळख प्राप्त झाली. कोकणीच्या विकासासाठी पुष्कळ वाव असून नाटक, सिनेमांद्वारेही कोकणीचा विकास होत आहे.

गोवा विद्यापीठातही कोकणीतून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला आहे. त्याचा लाभ गोव्यासह इतर राज्यांतील कोकणी भाषिकांनी घ्यावा, असे आवाहन सावंत यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT