Arambol Beach Dainik Gomantak
गोवा

Arambol News: हरमल किनारी प्राथमिक सुविधांचे तीनतेरा, पर्यटन विभागाच्या भोंगळ कारभाराचा पर्यटकांना फटका

ऐन पर्यटन हंगामात प्रसाधनगृह प्रकल्प बारगळल्याने नागरिकांचा संताप

गोमन्तक डिजिटल टीम

Arambol News हरमल किनारी आता समुद्रस्नानासाठी गर्दी होत आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात लोक खाऱ्या पाण्याने आंघोळ करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करतात. दरवर्षी शिरगावची श्री देवी लईराईची जत्रा आटोपली की ज्येष्ठ नागरिक ज्यांना संधीवाताचे दुखणे तसेच अन्य इजा असते ती मंडळी तीन, पाचवेळा स्नान उरकून घेतात.

हरमल किनाऱ्यावर प्रसाधनगृह किंवा चेंजिंग रुम नसल्याने महिलांची मात्र गैरसोय होत आहे. पर्यटन विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. या प्रश्‍नावर लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

यासदंर्भात, पेडणे येथील नागरिक नीळकंठ परब म्हणाले की, आता जमाना बदलला असून गेस्ट हाउस संस्कृती विकसित झाली आहे. हजारो रुपये खर्च करुन रुम बुक केल्या जातात. मात्र किनाऱ्यावर नागरिकांसाठी प्रसाधनगृह किंवा चेंजिग रुम असल्या तर महिलांसाठी ते सोयीचे ठरेल.

मात्र कपडे बदलण्यासाठी सोय नसल्याने होडी ठेवण्यासाठीच्या झोपड्यात महिलांना कपडे बदलावे लागतात. प्रत्येक किनाऱ्यावर आता चेजिंग रुमची मागणी वाढत आहे.

प्रसाधनगृह उभारा

हरमल भागात एक कोटी रुपये खर्चून प्रसाधनगृह बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याबाबत त्यात कमिशन किती असेल अशी लोकांमध्ये चर्चा रंगली होती. मात्र, हा प्रकल्प बारगळल्यामुळे जनतेचे पैसे वाचले, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

तरी मांद्रे मतदारसंघाचे आमदार गीत आरोलकर यांनी पर्यटन खात्यामार्फत ठोस भूमिका घेऊन प्रसाधनगृहाची सुविधा उभारावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

Goa Drug Menace Crisis: अमली पदार्थांचा विळखा आता थेट शाळांपर्यंत! किनारपट्टीपासून गावागावांत ड्रग्जचं जाळं पसरलं तरी सरकार 'ढिम्म'; सरदेसाईंचा घणाघात

कदंब बसस्थानकात खासगी बसचालकांची मनमानी! म्हापशात प्रवासी, वाहनधारक त्रस्त: नागरिकांकडून कारवाईची जोरदार मागणी

SCROLL FOR NEXT