Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway: Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Highway: नितीन गडकरींनी घेतली जबाबदारी; म्हणाले- मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार...

डिसेंबरपर्यंत महामार्ग पूर्ण करण्याचा विश्वास; आयुष्यात सर्वाधिक बैठका याच रस्त्यासाठी घेतल्या...

Akshay Nirmale

Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway: गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. सध्याही या महामार्गाचे काम सुरू आहे. तथापि, अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे तसेच त्यासाठीच्या आंदोलनांमुळे, विविध अपघातांमुळे हा महामार्ग सतत चर्चेत असतो.

दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महार्माग पूर्ण होण्यास विलंब झाला आहे, याची कबुली देत त्याला ते स्वतःच जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे.

सकाळ माध्यम समुहाकडून आयोजित कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांची मुलाखत घेतली.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम इतकी वर्षे का रखडले या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, "पहिली गोष्ट म्हणजे महामार्ग झाला नाही त्याला मीच जबाबदार आहे. याची जबाबदारी मी दुसऱ्यावर ढकलंत नाही.

कोकणातील नदीवरील पूल वाहून गेला, त्यानंतर तो आम्ही आठ-नऊ महिन्यात पूर्ण केला. खरं म्हणजे हा महामार्ग जर आधीच पूर्ण झाला असता तर हे लोकही मृत्यू पावले नसते.

पहिल्यांदा हा महामार्ग महाराष्ट्र सरकारकडं दिला होता. त्यावेळी छगन भुजबळ मंत्री असताना त्यांनी टेंडर काढून याची कामं दिली. त्यातले कॉन्ट्रॅक्टर बदलले, पुरेशा अडचणी आल्या. जागा अधिग्रहणाला अजूनही अडचणी येत आहेत.

पण ज्या काही अडचणी आणि समस्या आल्या असतील त्याला मी इतर कोणालाही जबाबदार धरत नाही.

सर्वाधिक मीटिंग्ज

मंत्री गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गासाठी मी माझ्या आयुष्यात सर्वाधिक बैठका घेतल्या. जवळपास 75 ते 80 बैठका झाल्या असतील तरीही मला यश मिळालं नाही. पण याचं वर्षी डिसेंबर महिन्याच्या आत हा मुंबई-गोवा रस्ता पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT