Rakhi For Soldier Dainik Gomantak
गोवा

Rakhi For Soldier: एक राखी जवानांसाठी!

राज्यपाल आर्लेकर : जिमखाना पणजी येथे कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

चैतन्य प्रतिष्ठान गोवा या संस्थेतर्फे मागील 9 वर्षांपासून ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येतो. सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.

गोव्यातील नागरिक व विद्यार्थ्यांकडून जवानांसाठी मोठ्या प्रमाणात राख्या याव्यात, असे आवाहन चैतन्य प्रतिष्ठान गोवाचे संचालक तथा बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.

ते कृष्णदास शामा मध्यवर्ती वाचनालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अनघा आर्लेकर उपस्थित होत्या.

दरम्यान, आर्लेकर म्हणाले, गोव्यातून आलेल्या सर्व राख्या सोमवार, २१ ऑगस्ट रोजी जवानांना सुपुर्द केल्या जातील.

त्यासाठी पणजीतील जिमखाना येथे सायंकाळी ४.३० वा. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे उपस्थित राहतील तर अध्यक्षस्थान उद्योजक मनोज काकुलो भूषवतील.

येथे पाठवा राख्या

ज्या व्यक्तींना सैनिकांना राख्या पाठवायच्या असतील त्यांनी राज्यभरातील आपल्या जवळच्या केंद्रात 20 ऑगस्टपूर्वी राख्या द्याव्यात. राखी जमा करण्याची ठिकाणे : पणजी - बॅंझ शोरूम, फोंडा - विश्‍व हिंदू परिषद कार्यालय, मडगाव - माया बुक स्टॉल, म्हापसा - बॅंझ शोरूम, डिचोली : दीनदयाळ नागरी सहकारी संस्था, मुळगाव - वास्को गॅस एजन्सी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT