Anjune Dam Dainik Gomantak
गोवा

Anjunem Dam : अंजुणे धरणातून लवकरच जलविसर्ग! जलसाठा ८७.३० मीटर

Anjunem Dam : धरण क्षेत्रात तसेच चोर्ला डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन या एकूण ९३.२ मीटर क्षमतेच्या धरणातील पाण्याची पातळी ९० मीटर झाल्यानंतर त्यातील पाणी सोडण्यास प्रारंभ होतो.

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी, केरी-सत्तरीतील अंजुणे धरण हे लवकरच फुल्ल होण्याच्या मार्गावर असून येत्या दोन तीन दिवसांत या धरणातून अतिरिक्त पाणी नदीत सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आज शुक्रवार १२ जुलै रोजी धरणाने ८७.३० मीटर इतकी पाण्याची पातळी गाठली. आता ९० मीटरपर्यंत पाणी पातळी पोहोचताच अतिरिक्त पाणी धरणातून बाहेर सोडण्यात येणार आहे. याबाबतची नोटीस गुरूवार ११ जुलै रोजी खात्यातर्फे जारी करण्यात आली आहे.

९३.२ मीटर इतकी क्षमता असलेल्या या धरणाने यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ दिवस अगोदरच ८७ मीटर ही पातळी गाठली आहे. गेल्यावर्षी २४ जुलै २०२३ रोजी या धरणाची पातळी ८७.५५ मीटर झाली होती. तर पाऊस १०० इंच झाला होता. यावर्षी आज २४ जुलै रोजी धरण क्षेत्रातील एकूण पाऊस ८३ इंच झाला आहे.

धरण क्षेत्रात तसेच चोर्ला डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन या एकूण ९३.२ मीटर क्षमतेच्या धरणातील पाण्याची पातळी ९० मीटर झाल्यानंतर त्यातील पाणी सोडण्यास प्रारंभ होतो. यावर्षी पाऊस वेळेवर सुरू झाल्याने सरासरीप्रमाणेच धरण भरायला सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT