Land Scam In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Land Scam|जमीन हडपप्रकरणी कारवाईचे अन्य पर्याय शोधावेत: आयरिश

आयरिश म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आश्रयाने जमीन हडप करण्याची प्रकरणे सुरू आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने जमीन हडप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकावर (एसआयटी) देखरेख ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. मात्र, राज्यात उच्च न्यायालयाचे अनेक नामवंत आणि प्रतिष्ठित निवृत्त न्यायाधीश असताना औरंगाबाद येथील न्यायाधीशांची नियुक्ती का केली असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यांनी केला आहे.

(Alternatives to action should be explored in land grab cases in Goa)

आयरिश म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आश्रयाने जमीन हडप करण्याची प्रकरणे सुरू आहेत. यात विविध राजकीय पक्षांचे मंत्री, नेते, आमदार सहभागी आहेत. मात्र, यापैकी कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे तपासाच्या निष्पक्षता आणि स्वातंत्र्यावर गंभीर शंका आणि प्रश्न निर्माण होतात. या प्रकरणांमध्ये कागदपत्रांसह मालमत्तेचे विक्री आणि हस्तांतरण नंतरची सर्व फसवणूक ही महसूल, अभिलेखागार, काही वकील, नोटरी आणि सरकारी अधिकारी यांच्या सहभागाने आणि संगनमताने अनेक दिवसांपासून सुरू आहे. या सर्व प्रकरणांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन संबंधित मालमत्ता योग्य त्या मालकांना परत मिळणे महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT