Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: स्मार्ट सिटी पणजीत रस्त्याच्या मधोमध भलंमोठं भगदाड; विटांचा ट्रक उलटून 4 कामगार गंभीर जखमी

रस्ता खचल्याने घडली घटना

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident: रस्तात पडलेल्या भगदाडामध्ये चाक अडकून जांभ्या विटांची वाहतूक करणारा ट्रक भररस्त्यात उलटला. पणजीतील मध्यवर्ती परिसरात ही घटना घडली आहे. काकुलो मॉल परिसरात ही घटना आज दुपारी 2 च्या सुमारास घडली असून या घटनेत 4 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

मागील पाच ते सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे दोन्ही बाजूंनी खोदकाम केले आहे. अपघात घडला त्यावेळीही सदर काम सुरु असून कामावर असलेले कर्मचारी यात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या हा रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. या ट्रकची पुढची काच फुटली असून ट्रक पुर्णपणे खड्ड्यात कलंडला आहे. ट्रकमधील विटाही खड्ड्यात पडल्या आहेत. ट्रकची एक बाजू पुर्णतः खड्ड्यात आहे. हा ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत.

दरम्यान, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. बॅरेकेडिंग करून हा रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. या ट्रकमधील साहित्य स्मार्ट सिटी योजनेतील कामासाठी नेले जात होते का, असे विचारल्यावर मोन्सेरात यांनी याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT