43% increase in revenue of Indoco Remedies Dainik Gomantak
गोवा

इंडोको रेमेडीज कंपनीच्या महसुलात 43 टक्के वाढ

आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या महसुलात 43 टक्के वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: इंडोको  रेमेडीज (Indoco Remedies) कंपनीने 2021-22 आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या महसुलात 43 टक्के वाढ झाली आहे. गतवर्षीच्या 322.50 कोटी इतक्या महसुलाच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीने 15.6 वृद्धीदरासह रु. 372.60 .कोटी इतक्या महसुलाची नोंद केली आहे.

गतवर्षीच्या 60.20 कोटी ईबीआयडीटीएच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीने 23.2 टक्के वृद्धीसह 86.20 कोटी इतका ईबीआयडीटीए नोंदवला आहे. तर गतवर्षीच्या 25.10 कोटींच्या तुलनेत 11.20 टक्केच्या वृद्धीसह रु. 41.60 कोटींची नोंद केली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत इंडोकोने गतवर्षीच्या रु. 589.30 कोटी महसुलाच्या तुलनेत 27.9 टक्केच्या वृद्धीसह रु 753.80 कोटी इतक्या महसुलाची नोंद केली असून गतवर्षीच्या 42.30 कोटी रुपये करोत्तर नफ्याच्या तुलनेत 10.8 टक्के वृद्धीदराने रु. 81.20 कोटी इतका नफा नोंदवला आहे.

या निकालावर भाष्य करताना इंडोकोच्या व्यवस्थापकीय संचालक अदिती पाणंदीकर म्हणाल्या, विक्रीमधील जोमदार वाढ, त्याचबरोबर आमच्या उत्पादन केंद्रांमधील कार्यक्षमता यांच्या जोरावर कंपनीने उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT