बेळगावहून गोव्याकडे येणारा 14 चाकी ट्रक कोसळला दरीत Dainik Gomantak
गोवा

बेळगावहून गोव्याकडे येणारा 14 चाकी ट्रक कोसळला दरीत

गोव्यातील चोर्ला घाट परिसर धोकादायक

दैनिक गोमन्तक

वाळपई : गोव्यातील चोर्ला घाट (Chorla Ghat) परिसर धोकादायक बनू लागला आहे. रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक कठडे नसल्यामुळे वाहनांचे सातत्याने अपघात (Accident) होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. दोन दिवसा आधी रात्री बेळगावहून गोव्याकडे येणारा 14 चाकी ट्रक सरळ दरीत कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकाराची जीवित हानी झाली नाही.

समोरून येणाऱ्या वाहनांना वाट देत असताना हा भीषण अपघात घडला. त्या ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या बाजूला गाडी घेतल्यामुळे त्याला रात्रीचा रस्त्याचा अंदाज आला नाही आणि वाहन रस्त्यावरून सुमारे वीस मीटर खाली कोसळले. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रक चालक व इतरांनी प्रसंगावधान राखून आपला जीव वाचविला, अन्यथा या अपघातात मोठा अनर्थ घडला असता.

त्या अवजड ट्रकमध्ये औद्योगिक वसाहतीमधील एका फॅक्टरीचे सामान होते. या अपघातात सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त किमतीच्या सामानाचे नुकसान झाले. दरम्यान, यावर्षी पावसाळ्यात अनेकवेळा घाटात दरडी कोसळल्यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून रस्त्यावरील माती काढून बाजूला टाकण्यात आली होती. मात्र उर्वरित माती अजूनही रस्त्यावरच आहे. आणि त्या मातीवरून वाहने घसरुन अपगात वाढत आहे. यामुळे रात्री-अपरात्री या घाटात वाहन चालवतांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने जबाबदारी घेवून या रस्त्यावरील ही माती हटविणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT