Abbakka Devi history, Ullal Queen war Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Abbakka Devi History: पोर्तुगिजांनी युद्धाच्या आधी सैन्याचे तंबू पेटवून दिले, 'राणी अब्बक्का'ने अग्निबाण वापरला; अज्ञात इतिहास

Ullal Queen war: या उल्लालच्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या चौताच्या घराण्याने प्रथम राज्यकर्त्यांमध्ये विक्रू चौताने १४व्या शतकात राज्य केले. ते काही काळ विजयनगरच्या राजांशी जोडले गेले.

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वेश बोरकर

केरळमधील कासारगोडच्या उत्तरेला, जिथे मलबारच्या ऐतिहासिक सीमा संपतात, पण मंगळूरच्या दक्षिणेस, नेत्रावती नदीच्या सीमेला लागून आणि अरबी समुद्राला जवळपास उल्लाल नावाची छोटी नगरपालिका. ऐतिहासिकदृष्ट्या त्यांचा कालिकतच्या झामोरिन राजांशी आणि पोर्तुगिजांशी खूप जवळचा संबंध होता.

बहुतेक पाठ्यक्रमातील पुस्तकांत अब्बक्का देवी किंवा तिरुमला राणी नावाच्या उल्लालच्या राणींचा उल्लेखसुद्धा सापडत नाही. या उल्लालच्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या चौताच्या घराण्याने प्रथम राज्यकर्त्यांमध्ये विक्रू चौताने १४व्या शतकात राज्य केले. ते काही काळ विजयनगरच्या राजांशी जोडले गेले आणि चौटांच्या राजवटीत मुडभिद्रे हे जैन धर्माचे केंद्र बनले आणि त्यांनी विजयनगरला खंडणी देत त्यांचे स्वामित्व स्वीकारले.

उल्लाल आणि पुट्टीगेवर राज्य करणाऱ्या राण्यांचा पहिला उल्लेख १५७१च्या सुमारास समोर येतो तो पुट्टीगे येथे लोकदेवी आणि उल्लाला येथे अब्बक्कादेवीच्या नावाने. १५१०मध्ये पोर्तुगीज गोव्यात स्थायिक झाले होते आणि समुद्रावर राज्य करत होते.

केरळला बहुतेक तांदूळ निर्यात मलबार बोटी वापरून उल्लाल आणि जवळच्या बंदरांमधून होत असे. पोर्तुगीज जसजसे अधिकाधिक सामर्थ्यवान होत गेले, तसतसे त्यांनी स्थानिक सरदारांना वश करण्यास सुरुवात केली आणि उल्लालाच्या राज्यकर्त्यांचा पोर्तुगीज सामर्थ्याशी आलेला पहिला संघर्ष १५५५-५८च्या सुमारास झाला जेव्हा पोर्तुगीज डोम अल्वारेसने उल्लाल व्यापारातून बडतर्फ केले, ज्याचं कारण स्वतः राणी होती. तिच्या बंदरात कालिकतची जहाजे सापडली.

पोर्तुगिजांनी उल्लालसोबत इतर योजना आखल्या. त्यांनी नदी आणि राणीच्या हद्दीतील सीमेवरील प्रवेश नियंत्रित करण्यासाठी दक्षिण किनाऱ्यावर एक किल्ला बांधण्याची योजना आखली.

परंतु उल्लाल राणी तिच्या स्वत:च्या किल्ल्यात मोठ्या सैन्यासह थांबली होती, तर पोर्तुगिजांनी युद्धाच्या आधीच्या एका रात्रीत तिच्या सैन्याचे तंबू पेटवून दिले. दंगलीत, उल्लाल राणीच्या सैन्याने हल्ला केला आणि मोठ्या संख्येने पोर्तुगीज मारले गेले. पुढील दिवसांच्या सुडाचा परिणाम उल्लाल बडतर्फ करण्यात आले.

पण या सर्व प्रकारानंतर, पोर्तुगिजांनी दक्षिण किनाऱ्यावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला आणि बांगर राजा वीरसिंह तिसऱ्याने त्यांना दिलेल्या जागेवर उत्तर किनाऱ्यावर आपला किल्ला बांधला.

पोर्तुगिजांविरुद्धच्या तिच्या धाडसी भूमिकेचा दूरदूरपर्यंत उल्लेख केला गेला आणि याच क्षणी राणीने कालिकत झामोरिन राजाशी औपचारिक संबंध प्रस्थापित केले आणि भविष्यात पोर्तुगिजांविरुद्ध युद्ध करण्याचे आश्वासन घेतले. मध्यंतरीच्या काही वर्षांत पहिल्या वीर राणीचा कारकलांशी झालेल्या लढाईत मृत्यू झाला, त्यानंतर तिच्या भावाने उल्लालवर राज्य केले. दुसरी अब्बक्का देवी किंवा तिरुमला देवी, तिची मुलगी, जिचा सोळाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात उल्लेख सापडतो.

उल्लाल राजांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत, १५८९मध्ये पोर्तुगीज किल्ल्यापासून फार दूर, उल्लाल नदीच्या पलीकडे त्याच काठावर आणखी एक किल्ला बांधला. हाच किल्ला बंग, उल्लाल आणि पोर्तुगीज यांच्यातील वादाचा एक मोठा मुद्दा बनला.

डिसेंबर १५८९ च्या उत्तरार्धात ते बांधकाम नष्ट करण्यासाठी पोर्तुगीज कुतिन्हो याला तीन गॅली (मोठं जहाज) आणि ३० जहाजांसह नियुक्त करण्यात आले. निष्फळ वाटाघाटीनंतर, पोर्तुगिजांनी पुन्हा एकदा हल्ला केला आणि उल्लालचा बराचसा भाग नष्ट केला. किल्ला मात्र अबाधित राहिला आणि तो नष्ट झाला नाही म्हणून पोर्तुगालचा राजा संतापला.

अब्बक्का देवी द्वितीय यांनी बंगांशी प्रतिकूल वृत्ती पुन्हा नव्याने वाढवली व या विरुद्ध काठावरील किल्ल्यापासून, राणीचा पोर्तुगिजांसाठी नेहमीच धोका होता आणि नवीन राणीने तो नष्ट करण्यास नकार दिला होता. राजाच्या सूचनेनुसार, गोव्याच्या व्हाईसरॉयने डोरन ए आझावेदो याला उल्लाल येथे किल्ला जमीनदोस्त करण्यासाठी पाठवले आणि शेवटी १५९५मध्ये किंवा त्यानंतर अझेवेडोने तो नष्ट केला.

अब्बक्का देवी ऊर्फ तिरुमला देवी यांनी पोर्तुगिजांविरुद्ध लढा चालू ठेवला, बंगांशी त्यांचे तीव्र शत्रुत्व चालूच राहिले आणि १६१६मध्ये बांगरांनी उल्लालवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले. राणीला बंगांच्या विरोधात केलाडी नायकांची मदत घेण्याशिवाय पर्याय नव्हता कारण बंगांनी मदतीसाठी पोर्तुगिजांकडे संपर्क साधला होता. रणांगणावर जे जिंकता येत नाही, ते विश्वासघाताने आणि चोरीने जिंकता येते हे पोर्तुगिजांना माहीत होते. मंगळूरचा बंग राजाला पोर्तुगिजांनी मंगळुरूची राजधानी जाळण्याची धमकी देत उल्लालला कोणतीही मदत न पाठवण्याचा इशारा दिला होता.

राजाचा पुतण्या, कामरायाला त्याच्या काकाविरुद्ध कट रचण्यासाठी आणि मंगळुरूचे सिंहासन बळकावण्यासाठी गुप्तपणे भरती करण्यात आले. त्याच्या स्वत:च्या पुतण्याने रचलेला कट आणि पोर्तुगिजांच्या आक्रमणाच्या धमकीमुळे लक्ष्मप्पा बंग-राजा असाहाय्य झाले आणि पोर्तुगिजांच्या पुढच्या हल्ल्यात आपल्या पत्नीला मदत करू शकले नाहीत.

स्थानिक आख्यायिकेप्रमाणे राणी अबक्का देवी, तिचा पती लक्ष्मप्पा बंगपासून विभक्त झाली होती, ज्याने पोर्तुगिजांशी संगनमत करून आपल्या पत्नीशी युद्ध केले होते. हा तिचा नवरा, कमराया तिसरा याचा पुतण्या होता, ज्याने राणीविरुद्ध लढा दिला. अब्बक्का धर्माने जैन होती, तरी तिच्या प्रशासनात हिंदू आणि मुस्लिमांचे चांगले प्रतिनिधित्व होते.

तिच्या सैन्यातही सर्व पंथ आणि जातींचे लोक होते ज्यात मोगवीरांचा समावेश होता, जो एक मच्छीमार लोक समुदाय होता. तिने यासाठी कालिकतच्या झामोरिन आणि तुलुनाडूच्या दक्षिणेकडील इतर मुस्लीम शासकांशी युती केली. एकत्रितपणे, त्यांनी पोर्तुगिजांना दूर ठेवले. शेजारच्या बंग राजवंशाशी असलेल्या वैवाहिक संबंधांमुळे स्थानिक शासकांच्या युतीला आणखी बळकटी मिळाली.

पारंपरिक कथेनुसार, ती एक प्रचंड लोकप्रिय राणी होती आणि आजही ती लोककथांचा एक भाग आहे. राणीची कहाणी लोकगीते आणि तुळुनाडूमधील लोकप्रिय लोकनाट्य यक्षगान याद्वारे पिढ्यान्पिढ्या सांगितली जात आहे. स्थानिक धार्मिक नृत्य असलेल्या भूता कोलामध्ये अब्बक्का महादेवीच्या व्यक्तिरेखा महान कृत्यांचे वर्णन करते.

अब्बक्का महादेवीला देखण्या म्हणून चित्रित केले जाते, ती नेहमी सामान्य माणसासारखे साधे कपडे घालते. तिला एक काळजीवाहू राणी म्हणून चित्रित केले आहे जी रात्री उशिरापर्यंत न्याय देण्यासाठी काम करते. आख्यायिका असाही दावा करतात की पोर्तुगिजांविरुद्धच्या लढाईत अब्बक्का ही शेवटची ज्ञात व्यक्ती होती जिने अग्निबाण वापरला होता. काही कथेत असेही म्हटले आहे की तिच्या दोन तितक्याच शूर मुली होत्या ज्या पोर्तुगिजांविरुद्धच्या युद्धात तिच्यासोबत लढल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Trayodashi 2026: 14 की 15 फेब्रुवारी, कधी आहे 'शनि त्रयोदशी'? साडेसातीपासून मुक्ती मिळवण्याचा सर्वोत्तम योग; जाणून घ्या पूजेची अचूक वेळ अन् शुभ मुहूर्त

"रिफ्रेश आणि रिचार्ज!" फायनलपूर्वी RCBच्या पोरींची गोव्यात धम्माल; स्मृती अन् सायलीचा कूल अंदाज तर श्रेयंका-अरुंधतीचा स्टायलिश लूक चर्चेत

भारताला टार्गेट करुन अमेरिकेची मोठी कारवाई! 'ऑपरेशन मेल्टडाउन' अंतर्गत 200 हून अधिक फार्मसी वेबसाइट्स बंद; काय नेमकं प्रकरण?

Dhurandhar 2 ने रिलीजपूर्वी तोडले सर्व रेकॉर्ड! मिळवले बक्कळ पैसे; एवढ्या किमतीत विकले OTT Rights

GCA: 'कोट्यवधींच्या जीसीए घोटाळ्याची चौकशी 6 महिन्यांत करा'! न्यायालयाने दिले निर्देश; निविदा न काढताच 6.5 कोटींच्या वर्क ऑर्डर्स

SCROLL FOR NEXT