Blue Flag Beaches  Dainik Gomantak
ग्लोबल

Blue Flag Beaches: जगातील सर्वात स्वच्छ समुद्र किनाऱ्यांमध्ये भारतातील आणखी दोन किनाऱ्यांचा समावेश

देशातील एकुण 12 समुद्रकिनाऱ्यांचा यादीत समावेश; पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

गोमन्तक डिजिटल टीम

Blue Flag Beaches: जगातील सर्वात स्वच्छ समुद्र किनाऱ्यांमध्ये भारतातील आणखी दोन समुद्र किनाऱ्यांचा समावेश झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव यांनी दिली. या समुद्र किनाऱ्यांना मानाचा ब्ल्यू फ्लॅग देण्यात आला आहे. या निवडीनंतर भारतातील ब्ल्यू बीचेसची संख्या आता 12 वर गेली आहे.

लक्षद्वीप येथील थुंडी आणि कडमत अशी या नव्या दोन समुद्र किनाऱ्यांची नावे आहेत. हा अभिमानाचा क्षण आहे, हा शाश्वत पर्यावरणासाठी केलेल्या भारताच्या अथक प्रयत्नांचा भाग आहे, असे ट्विट भुपिंदर यादव यांनी केले आहे.

लक्षद्वीपवरील थुंडी किनाऱ्यावर पांढरी वाळू आहे. तर कडमत किनारा हा क्रुझ पर्यटकांमध्ये वॉटर स्पोर्टससाठी प्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून लक्षद्वीपच्या नागरिकांचे अभिनंदन करताना ही उत्तम यश असल्याचे म्हटले आहे.

देशातील या समुद्रकिनाऱ्यांचा यादीत समावेश

या यादीतील इतर समुद्रकिनाऱ्यांमध्ये गोल्डन बीच (ओडिशा), शिवराजपुर (गुजरात), कप्पड (केरळ), घोघला (दिव), राधानगर (अंदमान आणि निकोबार), कासारकोड (कर्नाटक), पदुबिद्री (कर्नाटक), ऋषीकोंडा (आंध्र प्रदेश), कोवलम (तामिळनाडू), एडन (पुदुच्चेरी) या किनाऱ्यांचा समावेश आहे.

पुरीतील गोल्डन बीच हा आशियातील पहिला ब्ल्यू फ्लॅग मिळालेला किनारा आहे. गतवर्षी त्यात कोवलम आणि एडन या किनाऱ्यांचा समावेश झाला होता. फाऊंडेशन फॉर एनव्हायर्नमेंटल एज्युकेशन (एफईई) या ना नफा तत्वावर आधारीत संघटनेमार्फत हा ब्लू फ्लॅग दिला जातो.

जगातील सर्वात स्वच्छ समुद्र किनाऱ्यांना हे लेबल दिले जाते. त्यासाठी 33 निकष पाळावे लागतात. पर्यावरण, शिक्षण, सुरक्षितता यांवर आधारीत हे निकष आहे. या संस्थेचे मुख्यालय कोपेनहेगन, डेन्मार्क येथे आहे. सध्या 77 देश या संघटनेचे सदस्य आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT