Indian government issues e visas to Hindus in Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदू नागरिकांना भारताकडून ई-व्हिसा

गुरूद्वारावरील हल्ल्यानंतर पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला.

दैनिक गोमन्तक

भारत सरकारने अफगाणिस्तानातील 100 हून अधिक शीख आणि हिंदू नागरिकांना भारताचा व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ई-व्हिसा जारी केला आहे. एक दिवस आधी 18 जून रोजी राजधानी काबूलमधील गुरुद्वारा कर्ते परवानवर दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी येथे अनेक स्फोट घडवले होते.

या हल्ल्यात गुरुद्वाराचा मुस्लिम सुरक्षा रक्षक ठार झाला. तिघांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात पाठवण्यात आले. कर्ते परवान गुरुद्वारा समितीचे सदस्य तलविंदर सिंग चावला यांनी घटनास्थळाबाहेरून सांगितले की, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पवित्र ग्रंथ सुखरूप बाहेर काढण्यात आला
गुरूद्वारावरील हल्ल्यानंतर पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. अफगाण शीख पवित्र ग्रंथ वाचवण्यासाठी आग लागलेल्या इमारतीत घुसले होते. या हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, पवित्र गुरुद्वारावरील हल्ल्याच्या वृत्ताने आम्ही खूप चिंतित आहोत.

या हल्ल्यामागे इसिस खोरासानचा हात आहे
काबूलमधील गुरुद्वारावरील हल्ल्यामागे ISIS खोरासानचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला सकाळी 7.15 वाजता (भारतीय वेळेनुसार 8.30 वाजता) झाला. हल्ल्याच्या वेळी गुरुद्वारामध्ये 25-30 अफगाण हिंदू आणि शीख सकाळच्या प्रार्थनेसाठी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

हडफडे अग्नितांडव प्रकरण! 'बर्च बाय रोमिओ लेन'च्या मालकांचे धाबे दणाणले; अजय गुप्ताची जामिनासाठी कोर्टात धाव

Goa Raj Bhavan Name Change: गोव्यात ऐतिहासिक निर्णय! 'राजभवन' आता ओळखले जाणार 'लोकभवन' नावाने; राज्यपालांनी पुसली वसाहतवादी ओळख

Cyber Fraud: 'अनन्या'च्या जाळ्यात अडकला एसबीआय क्लर्क, फेसबुकवरची एक फ्रेंड रिक्वेस्ट अन् 92 लाखांचा गंडा; काय नेमकं प्रकरण?

बेतुल ONGC परिसरात अग्नितांडव! वेल्डिंगच्या ठिणगीमुळे भीषण आग; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT