S. Jayshankar Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानच्या आर्थिक संकटात भारत करणार मदत? जयशंकर म्हणाले...

Pakistan: आयएमएफने देखील कर्ज देण्यासाठी पाकिस्तानसमोर काही अटी ठेवल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Pakistan Economic Crisis: भारताचा शेजारी देश पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना उदर्निवाहासाठीदेखील हाल सहन करावे लागत आहेत. आयएमएफने देखील कर्ज देण्यासाठी पाकिस्तानसमोर काही अटी ठेवल्या आहेत.

आता भारताने पाकिस्तानला मदत करण्यावर वक्तव्य केले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर हे याबाबत वक्तव्य केले आहे. कोणताही व्यक्ती अचानक अशा परिस्थितीत पोहचत नाही.

आज भारताचे पाकिस्तानबरोबर असे कोणतेही संबंध नाहीत ज्याद्वारे भारत सरळ पाकिस्तानच्या मदतीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकेल. यातून बाहेर निघण्यासाठी पाकिस्तानलाच कोणतातरी मार्ग काढावा लागेल. त्याचबरोबर पाकिस्तानची कामे आणि त्याने घेतलेले निर्णय यावर पाकिस्तानचे भविष्य निर्भर आहे, असे एस.जयशंकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एस.जयशंकर यांनी पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा दिल्याने दोन्ही देशातल्या संबंधात तणाव निर्माण झाल्याचे म्हटले आहे. याआधी भारताने श्रीलंके( Srilanka)त आर्थिक आणिबाणी निर्माण झाली होती तेव्हा श्रीलंकेला मोठी मदत केली होती. भारताची नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याची भूमिका असते असे एस.जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT