Pani puri  Dainik Gomantak
ग्लोबल

नेपाळ मधील काही भागात पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी

पाणीपुरीत वापरण्यात येणाऱ्या पाण्यात कॉलराचे जीवाणू आढळून आल्याचा दावा शहर प्रशासनाकडून करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने काठमांडू खोऱ्यातील ललितपूर मेट्रोपॉलिटन सिटी (LMC) मध्ये पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आतापर्यंत येथे कॉलराचे 12 रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी शहरात पाणीपुरी विक्री व वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाणीपुरीत वापरण्यात येणाऱ्या पाण्यात कॉलराचे जीवाणू आढळून आल्याचा दावा शहर प्रशासनाकडून करण्यात आला. शहर पोलीस प्रमुख सीताराम हाचेथू यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गजबजलेल्या भागात आणि कॉरिडॉर भागात पाणीपुरीची विक्री बंद करण्यात आली आहे.

आरोग्य आणि लोकसंख्या मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, काठमांडू व्हॅलीमध्ये कॉलराच्या रुग्णांची एकूण संख्या 12 वर पोहोचली असून आणखी सात जणांना कॉलराची लागण झाली आहे. एपिडेमिओलॉजी आणि रोग नियंत्रण विभागाचे संचालक चुमनलाल दास यांच्या म्हणण्यानुसार, काठमांडू महानगरात कॉलराची पाच प्रकरणे आणि चंद्रगिरी नगरपालिका आणि बुधानीलकंठा नगरपालिकेत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

दरम्यान, आरोग्य आणि लोकसंख्या मंत्रालयाने लोकांना कॉलराची लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: उन्हाळा आणि पावसाळ्यात अतिसार, कॉलरा आणि इतर जलजन्य आजारांचा फैलाव होत असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याची विनंती मंत्रालयाने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT