Pakistan Bus Fire  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Bus Fire: कराचीत बसला लागलेल्या आगीत 18 पुरग्रस्तांचा होरपळून मृत्यू; 8 बालकांचाही समावेश

एसी खराब झाल्याने घडली दुर्घटना; 10 जखमींवर रुग्णालयात उपचार

गोमन्तक डिजिटल टीम

Pakistan Bus Fire: पाकिस्तानातील कराची येथे एका बसला आग लागून या बसमधील १८ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी पुरग्रस्त होते. या पुरग्रस्तांना घेऊन ही बस कराचीहून खैरपूर नाथन शाह भागात जात होती.

कराची बंदरला हैदराबाद आणि सिंध प्रांतातील जमशोरो शहराला जोडणाऱ्या सुपरहायवेवर नुरियाबादजवळ बुधवारी रात्री ही घटना घडली. पुरग्रस्त लोक या बसमधून दादू जिल्ह्यातील आपापल्या घरी जात होते. दादू हा जिल्ह्या सिंध प्रांतातील सर्वाधित पुरबाधित जिल्ह्यांपैकी एक आहे. हे सर्व मुगैरी समुदायाचे लोक आहेत.

संसदीय आरोग्य सचिव सिराज कासिम सूमरो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, बसमध्ये जवळपास ३५ प्रवासी होते. बसच्या मागील बाजूस आग लागली आणि बघताबघता ती वेगाने संपुर्ण बसमध्ये पसरली. एसीमध्ये बिघाड झाल्याने आग लागल्याचे सांगितले जात आहे. काहींनी जीव वाचविण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १० जण जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सिंध प्रांतांचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी जमशोरोच्या उपायुक्तांना तातडीने घटनास्थळी जाण्यास सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून मृतांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाईही दिली जाणार आहे. सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT