Mehbooba Mufti
Mehbooba Mufti  Dainik Gomantak
देश

India-Pakistan Ralations: मेहबूबा मुफ्ती भारताच्या 'कट्टर शत्रू' ची वकिली का करतात? मोठे कारण आले समोर

दैनिक गोमन्तक

Mehbooba Mufti's Statement: एक भारतीय नागरिक म्हणून, पाकिस्तानचे नाव घेतल्यावर तुमच्या मनात पहिली प्रतिमा कोणती उभी राहते. दहशतवाद आणि पाकिस्तानात सुरु असलेल्या असंख्य दहशतवादी छावण्यांबाबत सर्वांना माहिती आहे. कारण शेजारी देश असल्याने आपण स्वातंत्र्यापासून पाकिस्तानच्या या प्रॉक्सी युद्धाचा सामना करत आहोत. विशेष म्हणजे, तो पाकिस्तानच्या घोषित धोरणाचा एक भाग आहे.

स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तीन मोठी युद्धे झाली आहेत. 1999 मध्ये झालेल्या कारगिलच्या भीषण युद्धाच्या आठवणीही भारतीयांच्या मनात ताज्या आहेत. म्हणूनच जेव्हा-जेव्हा पाकिस्तानसोबत शांतता आणि व्यापाराची चर्चा होते, तेव्हा 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्याची स्मृती सर्वसामान्य भारतीयांच्या मनात तरळू लागतात.

भारत पाकिस्तानवर कसा विश्वास ठेवणार?

पाकिस्तानच्या (Pakistan) या धोरणामुळे भारत पाकिस्तानवर विश्वास ठेवण्याची हिंमत कधीच दाखवू शकत नाही. पण आज भारतात मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला यांच्यासारखे अनेक नेते आहेत, ज्यांच्या मनात फक्त आणि फक्त पाकिस्तानचाच विचार वसतो. पाकिस्तानच्या PR टीमचा एक भाग असल्याप्रमाणे ते पाकिस्तानशी चर्चा करण्याची वकिली करतात.

शहाबाज शरीफ यांच्याकडे शांतिदूत म्हणून पाहिले जाते!

मेहबुबा या भारताच्या नागरिक आहेत, सर्वसामान्य भारतीयांच्या करातून जमा झालेल्या पैशातून त्यांना अनेक सुविधा मिळतात. मात्र असे असूनही त्यांना भारतापेक्षा पाकिस्तानचीच जास्त चिंता आहे. म्हणूनच त्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांना शांतिदूत म्हणून पाहतात. ज्या पाकिस्तानचा खरा अजेंडा भारताचा नाश करणे आणि हजारो कटांसह भारतात रक्तपात घडवून आणणे आहे.

पाकिस्तानशी संवाद का माधुर्य आहे?

मेहबुबा मुफ्तीच नाही तर जम्मू-काश्मीरचे आणखी एक माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे देखील पाकिस्तानशी चर्चेची वारंवार मागणी करतात. जेव्हा मेहबुबा मुफ्ती शाहबाज शरीफ यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करतात, तेव्हा अब्दुल्ला का मागे राहतील?

खरे तर, पाकिस्तानचे पंतप्रधान शरबाज शरीफ यांनी काही दिवसांपूर्वी अल अरेबिया वाहिनीला मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्यांनी कबूल केले होते की, 'पाकिस्तानने भारतासोबत तीन युद्धे केली आणि या युद्धांतून त्यांना विनाशाशिवाय काहीही मिळाले नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT