Who to marry when to give birth to children everything is in Modi's hand's

 

Dainik Gomantak 

देश

'कुणाशी लग्न करायचं, मुलांना कधी जन्माला घालायचं सगळं मोदींच्या हातात'

सरकारच्या या निर्णयावर देशातील महिला खासदारांनी (Women MPs) वेगळी भूमिका मांडली आहे.

दैनिक गोमन्तक

मुलींच्या लग्नाचे वय 18 वरुन 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला असल्याची माहीती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकीत हा नर्णय घेण्यात आला. महिलांच्या लग्नाचे वय बदलण्यासाठी सरकार सध्याच्या कायद्यात बदल करणार आहे. सरकारच्या या निर्णयावर देशातील महिला खासदारांनी (Women MPs) वेगळी भूमिका मांडली आहे. विरोधी पक्षांतील महिला खासदारांनी या प्रस्तावाला विरोध विरोध केला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana) यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत करताना आता मुलींना अधिक अधिकार मिळणार असल्याचे सांगितले आहे.

सरकारच्या या निर्णयाला विरोध करताना तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) खासदार डोला सेन (Dola Sen) यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले, "बघा, वाईट वाटू नका. मोदी राजवट चालू आहे. मोदी है तो मुमकिन है. तुमचा महिलांवर काय विश्वास आहे? बरं. त्यांना काय फरक पडतो? आपण काय खाऊ किंवा कोणता पेहराव घालायचा... कोणत्या वयात लग्न करणार. सर्व काही मोदीजींच्या हातात आहे."

त्या पुढे म्हणाल्या, बघा, काश्मीरचा मुद्दा आला तेव्हाही आम्ही मतदान करु, मग निर्णय घेऊ. त्यांचे मत काय, ते काही हेड मास्तर नाहीत. याबाबत प्रथम देशातील महिलांचा सल्ला घ्यावा, त्यांना काय हवे आहे?

दरम्यान, शिवसेना नेत्या आणि राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) म्हणाल्या की, "जे काही निर्णय महिलांना न विचारता... त्यांचे मत विचारता न घेता घेतले जात आहेत. मतदानाचे वय 18 वर्षे असेल, तेव्हा लग्नासाठी 21 वर्षे. मंत्रिमंडळ कसे ठरवेल. खूप अभ्यास करायचा, कोणाशी लग्न करायचं, मुलं कधी जन्माला घायालची... मग स्त्रिया काय करणार.अशाने बालविवाहही वाढले आहेत."

शिवाय, काँग्रेसच्या खासदार छाया वर्मा (Chhaya Verma) म्हणाल्या, "त्यांच्याकडे सध्या स्पष्ट बहुमत आहे. महिलांना संसद आणि विधानसभेत आरक्षण मिळायला हवे, असा कायदा ते का आणत नाहीत. महिलांबाबतचा निर्णय महिलांना घेऊ द्या. यासाठी विधेयक घेऊन त्यांना सत्ता द्या. महिलांवर गोष्टी लादू नका.

त्याचवेळी लोकसभा खासदार नवनीत राणा यांनी महिलांसाठी लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत केले. नवनीत राणा यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, आता मुलींना लग्नाचा निर्णय घेण्याचे, अभ्यास पूर्ण करण्याचे अधिक अधिकार असतील. त्यासाठी भारतीय समाजालाही तयार राहावे लागेल. वेळ लागेल. लग्नाचे वय 16 वरुन 18 वर्षे करण्यात आले, तेव्हा अनेकांना ते स्वीकारण्यास वेळ लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT