Uttar Pradesh Crime Dainik Gomantak
देश

Crime News: कौटुंबिक वादाचा 'रक्तरंजित अंत'! बाथरुमला जाण्यावरुन वाद अन् आईसह सावत्र भावाची निर्घृण हत्या; मिर्झापूर हादरलं

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली. शुल्लक कारणावरुन रागाचा पारा इतका चढला की, एका नराधमाने आपल्या सख्या आईची आणि सावत्र भावाची धारदार शस्त्राने हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण खूनी खेळ केवळ 'बाथरुमला आधी कोण जाणार' या वादातून सुरु झाला होता. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण पटेहरा परिसरात एकच खळबळ उडाली.

नेमकी घटना काय?

मिर्झापूरच्या पटेहरा येथील एका वडीलोपार्जित घरात हे कुटुंब राहत होते. या घराच्या खालच्या मजल्यावर मृत आयुष गुप्ता आणि त्याची आई राहत होते, तर वरच्या मजल्यावर आरोपी राहुल गुप्ता हा एकटाच राहत होता. राहुलची पत्नी त्याला आधीच सोडून गेली होती. मंगळवारी (13 जानेवारी) सकाळी राहुल गुप्ता बाथरुमला जाण्यासाठी उठला. त्याचवेळी त्याचा सावत्र भाऊ आयुष देखील तिथे पोहोचला. "आधी मी जाणार की तू," यावरुन दोघांमध्ये किरकोळ वादावादी सुरु झाली. मात्र, हा वाद इतका विकोपाला गेला की राहुलने रागाच्या भरात घरातून धारदार चाकू आणला आणि आयुषवर सपासप वार केले.

मध्यस्थी करायला गेलेल्या आईचाही घेतला बळी

दोन भावांमधील आरडाओरडा ऐकून त्यांची आई तिथे पोहोचली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी ती पुढे सरसावली, पण क्रूरतेची सीमा ओलांडलेल्या राहुलने रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या आईवरही हल्ला केला. त्याने आईचीही निर्घृण हत्या केली. अवघ्या काही मिनिटांत राहुलने आपल्याच कुटुंबातील दोन जणांचा खात्मा केला.

पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

दोघांची हत्या केल्यानंतर राहुल शांत बसला नाही. त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी दोन्ही मृतदेह घराबाहेर नेले. त्याने सावत्र भाऊ आयुषचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला, तर आईचा मृतदेह जवळच असलेल्या एका कालव्यात फेकला. सकाळी रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले.

पोलिस तपासात धक्कादायक खुलासे

मिर्झापूर पोलिसांनी (Police) तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि संशयाच्या आधारावर राहुल गुप्ताला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ बाथरुमचा वाद हे तात्कालिक कारण असले तरी या दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वडीलोपार्जित मालमत्तेवरुन वाद सुरु होता. मालमत्तेच्या वादातून मनात साठलेला राग बाथरुमच्या शुल्लक कारणाने उफाळून आला आणि त्याचे रुपांतर दुहेरी हत्याकांडात झाले.

आईच्या मृतदेहाचा शोध सुरु

पोलिसांना आयुषचा मृतदेह मिळाला आहे, मात्र कालव्यात फेकलेल्या आईच्या मृतदेहाचा शोध अद्याप सुरु आहे. पोलिसांनी आरोपी राहुल गुप्ताला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा (BNS संबंधित कलमान्वये) गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT