Race for CM of Rajasthan  Dainik Gomantak
देश

CM of Rajasthan: राजस्थानच्या राजकारणात ट्विस्ट! केंद्रीय मंत्र्याला मिळू शकते मुख्यमंत्रीपदाची खुर्ची

BJP: दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे यंदाही मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसह मोदी-शहांवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत. नुकतेच नव्याने निवडूण आलेल्या 60 आमदारांनी वसुंधरा राजे यांची भेट घेतल्याने राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी राजकारण तापल्याचे दिसत आहे.

Ashutosh Masgaunde

Union Minister Ashwin Vaishnav is leading the race for the Chief Minister of Rajasthan:

राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाची शर्यत तीव्र झाली आहे. दरम्यान, मोठी बातमी अशी आहे की, केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

अश्विनी वैष्णव या दोन मोठ्या मंत्रालयांचे केंद्रीय मंत्री आहेत. राजस्थानमध्ये भाजप ओबीसींना मुख्यमंत्री बनवू शकते आणि हा चेहरा अश्विनी वैष्णव असू शकतात, असे मानले जात आहे.

आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठकही दिल्लीत पार पडली ज्यामध्ये पक्षाकडून पंतप्रधान मोदींचा गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही, मात्र पक्षाकडून मुख्यमंत्रीपदावर नव्या चेहऱ्याची नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आता या शर्यतीत केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांचे नाव समोर येत आहे. केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून, अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याने सर्वोच्च नेतृत्व प्रभावित केले आहे.

वसुंधरा यांनी घेतली 60 आमदारांची भेट

यापूर्वी, सुमारे 60 नवनिर्वाचित आमदारांनी सोमवारी आणि मंगळवारी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानी भेट घेतली होती.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांचे नाव संसदीय मंडळ ठरवणार असून, त्याआधी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात येणार आहे. मात्र, विधीमंडळ पक्षाच्या बैठकीबाबत पक्षाने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. रविवारी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला ११५ तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या आहेत.

राज्यात 200 पैकी 199 जागांवर निवडणूक झाली आहे. काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे करणपूर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता येथे ५ जानेवारीला निवडणूक होणार असून ८ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत.

सध्या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी असलेल्या दावेदारांमध्ये जयपूरच्या राजघराण्यातील राजकुमारी दिया कुमारी आणि योगी बालकनाथ यांचाही समावेश आहे. हे दोघेही लोकसभा सदस्य असून त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

SCROLL FOR NEXT