Weather Dainik Gomantak
देश

उष्णतेपासून सुटका नाहीच, जाणून घ्या तुमच्या राज्यातील हवामानाची स्थिती

उत्तर भारतातील बहुतांश भागात पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. एप्रिलमध्येच मे आणि जूनप्रमाणे ऊन पडत आहे.

दैनिक गोमन्तक

संपूर्ण देश, विशेषत: उत्तर भारतातील अनेक राज्ये तीव्र उष्णतेच्या (Summer) विळख्यात आहेत. उत्तर भारतातील बहुतांश भागात पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. एप्रिलमध्येच मे आणि जूनप्रमाणे ऊन पडत आहे. आता उष्णता कमी होईल, अशी आशा लोकांना वाटत असली तरी दिलासा मिळण्याची अजिबात आशा नाही. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सध्या उष्णतेपासून दिलासा मिळालेला नाही. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुन्हा तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता आहे.

राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर के जेनामानी यांनी सांगितले. दिल्लीत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीचे 15 दिवस हे गेल्या 72 वर्षांतील उच्चांक होते. दिल्लीत पुढील 13 दिवस उष्णता कायम राहणार आहे. पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि हरियाणामध्ये ढगाळ आकाशामुळे तापमान 2-3 अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते आणि उष्णता कायम राहू शकते, असा अंदाज जेनामानी यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण भारतातील तापमान गेल्या 122 वर्षांतील सर्वोच्च आहे, असेही ते म्हणाले. कारण गेल्या 50 दिवसांपासून पाऊस झालेला नाही. 16 एप्रिलच्या आसपास राजस्थानमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. 18 एप्रिलपासून आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान खात्याने जारी केलेल्या मान्सूनच्या अंदाजानुसार यंदा देशभरात चांगला पाऊस होणार आहे. द्वीपकल्पीय भारताच्या उत्तरेकडील भाग, मध्य भारत, हिमालयाच्या पायथ्याशी आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट वेदरने यावर्षी सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात मान्सूनची सुरुवात चांगली होण्याची शक्यता आहे. जूनमध्येच जास्तीत जास्त पाऊस पडू शकतो. स्कायमेट हवामानानुसार, जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरात मान्सून 98 टक्क्यांनी सामान्य राहण्याची शक्यता आहे.

उष्णतेपासून बचावाबाबत नागरिकांना सतर्क केले आहे. या ऋतूत स्वतःची काळजी घ्या. दिवसा हलके अन्न खा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. कधीही अनवाणी बाहेर जाऊ नका. हलक्या रंगाचे सुती कपडे घाला, सिंथेटिक कपडे घालणे टाळा. उन्हाळ्यात कधीही रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नका. जास्त वेळ उन्हात राहायचे असेल तर छत्री वापरा. पाणी जास्त प्रमाणात प्या. बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT