Tourism Industry in India Dainik Gomantak
देश

देशाच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील

जी. किशन रेड्डी यांनी सांगितल्या सरकारी योजना

दैनिक गोमन्तक

Tourism: कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षात संपूर्ण जग थांबले होते. साथीच्या एकूण तीन लाटांमुळे देशाच्या पर्यटन उद्योगाशी संबंधित सुमारे 2 कोटी 15 लाख लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या असल्याची माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी सोमवारी दिली.

2020 सालच्या सुरुवातीला पहिल्यांदा आलेल्या कोरोना संक्रमणाच्या (Corona Infection) पहिल्या लाटेदरम्यान देशात पर्यटक येण्याचे प्रमाण 93 टक्क्यांनी, दुसऱ्या लाटेत 79 टक्क्यांनी, तर तिसऱ्या लाटेदरम्यान 64 टक्क्यांनी कमी झाले आहे. महासाथीच्या पर्यटनावर झालेल्या परिणामाबाबत आम्ही अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, करोनाच्या पहिल्या लाटेत 1 कोटी 45 लाख, दुसऱ्या लाटेत 52 लाख, तर तिसऱ्या लाटेत 18८ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या, असे रेड्डी यांनी सांगितले.

देशात पर्यटनक्षेत्राला (Tourism) आलेली मरगळ दूर करण्यासाठी आता प्रयत्नशील होणे गरजेचे आहे. या क्षेत्राला मदत करण्यासाठी प्रवास व पर्यटनाशी (Travel and tourism) संबंधितांना 10 लाख रुपयांचे आणि प्रवासाची माहिती देणाऱ्या गाईडना 1 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे. शक्य असेल त्या सर्व मार्गानी पर्यटन क्षेत्राला मदत करण्याचे आवाहन मी सर्व राज्य सरकारांना करतो, असे यावेळी किशन रेड्डी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी दीर्घायुष्याचे रहस्य समुद्राच्या तळाशी? व्हेल माशांमधील 'या' प्रथिनामुळे माणूस जगू शकणार 200 वर्षे! संशोधनातून खुलासा

मुंबई इंडियन्समध्ये मोठा फेरबदल? हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात, आता सूर्या नव्हे तर तिलक वर्माकडे संघाची धुरा!

Goa Govt Jobs: गोव्यात 709 पदांची मेगा भरती! 16 मेपासून सीबीटी परीक्षा; पोलिस खात्यात 596 जागा

New Gas Connection: महिनाभरात 11 हजार नव्या 'गॅस जोडण्या', बेकायदा सिलिंडरला बसला चाप

Maratha History: रायगड ते जिंजी: छत्रपती शिवरायांनी कशी उभारली स्वराज्याची दक्षिण फळी?

SCROLL FOR NEXT