Swachh Survekshan  Dainik Gomantak
देश

Swachh Survekshan Awards 2022: स्वच्छतेत या शहराचा दबदबा, सलग सहाव्यांदा पटकावले विजेतेपद

Swachh Survekshan Awards: गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता सर्वेक्षणाची यादी जाहीर करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Swachh Survekshan 2022: गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता सर्वेक्षणाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यंदाही इंदौरने बाजी मारली आहे. इंदौर सलग सहाव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. त्याचबरोबर गुजरातमधील सुरत दुसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर यंदा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी स्वच्छता सर्वेक्षण-2022 ची यादी जाहीर केली आहे. स्वच्छता सर्वेक्षण-2022 मध्ये मध्य प्रदेश (Madhya Pradesh) पुन्हा एकदा देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरले आहे. त्याचबरोबर स्वच्छ राज्यांच्या यादीत छत्तीसगड (Chhattisgarh) दुसऱ्या तर महाराष्ट्र (Maharashtra) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मध्य प्रदेश सर्वात स्वच्छ राज्य

स्वच्छता सर्वेक्षण-2022 मध्ये मध्य प्रदेश पुन्हा एकदा देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरले आहे. त्याचबरोबर स्वच्छ राज्यांच्या यादीत छत्तीसगड दुसऱ्या तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाच्या टॉप-10 स्वच्छ शहरांच्या यादीत राजधानी दिल्लीचाही (Delhi) समावेश आहे. त्याचबरोबर नोएडाही यावेळी 11 व्या क्रमांकावर आहे.

देशातील टॉप 10 स्वच्छ शहरे

1- इंदौर (मध्य प्रदेश)

2- सुरत (गुजरात)

3- नवी मुंबई (महाराष्ट्र)

4- विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश)

5- विजयवाडा (आंध्र प्रदेश)

6- भोपाळ (मध्य प्रदेश)

7- तिरुपती (आंध्र प्रदेश)

8- म्हैसूर (कर्नाटक)

9- नवी दिल्ली (दिल्ली)

10- अंबिकापूर (छत्तीसगड)

राष्ट्रपती मुर्मू यांनी गौरव केला

सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, त्रिपुरा 100 पेक्षा कमी शहरी स्थानिक संस्था असलेल्या राज्यांमध्ये अव्वल आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी एका कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतर मंत्रीही उपस्थित होते. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत महाराष्ट्रातील पाचगणी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ छत्तीसगडमधील पाटण (एनपी) आणि महाराष्ट्रातील करहारचा क्रमांक लागतो.

हरिद्वार हे गंगेच्या काठावरील सर्वात स्वच्छ शहर

एक लाखाहून अधिक लोकसंख्येच्या श्रेणीत हरिद्वार हे गंगेच्या काठावरील सर्वात स्वच्छ शहर राहिले. त्यानंतर वाराणसी आणि ऋषिकेशचा क्रमांक लागतो. सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गंगेच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये बिजनौर पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे कन्नौज आणि गडमुक्तेश्वर येते. सर्वेक्षणात महाराष्ट्रातील देवळालीला देशातील सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणून गौरविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT