Suryakumar Yadav Captain Dainik Gomantak
देश

Suryakumar Yadav Captain: 'मिस्टर 360' च्या हाती कमान! सूर्यकुमार यादव करणार मुंबई संघाचे नेतृत्व

suryakumar yadav to lead mumbai in syed mushtaq ali trophy: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आगामी २०२५-२६ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे.

Sameer Amunekar

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आगामी २०२५-२६ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वरिष्ठ निवड समितीची लवकरच बैठक होणार असून सूर्यकुमारने या स्पर्धेसाठी आपली उपलब्धता निश्चित केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात सामील होण्यापूर्वी तो मुंबईकडून मैदानात उतरणार आहे.

मुंबई आपला पहिला लीग सामना २६ नोव्हेंबर रोजी लखनऊ येथे खेळेल. या स्पर्धेत मुंबईचा सामना मुंबई रेल्वे, विदर्भ, आंध्र प्रदेश, आसाम, केरळ, छत्तीसगड आणि ओडिशा संघांविरुद्ध होणार आहे. सूर्यकुमार ६ आणि ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या शेवटच्या दोन लीग सामन्यांत खेळतो की नाही, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे, कारण ९ डिसेंबर रोजी कटकच्या बाराबती स्टेडियमवर भारत-दक्षिण आफ्रिका पहिला टी-२० सामना खेळला जाणार आहे.

या हंगामात सूर्यकुमार श्रेयस अय्यरची जागा घेणार असून, अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. एमसीएने यापूर्वी रणजी ट्रॉफीसाठी शार्दुल ठाकूरची निवड कर्णधार म्हणून केली होती आणि मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे जाण्याची शक्यता होती. मात्र अय्यरच्या अनुपस्थितीमुळे आणि सूर्यकुमारच्या उपलब्धतेमुळे, एमसीएने जेतेपदाच्या बचावासाठी अनुभवी भारतीय कर्णधारावर विश्वास टाकला आहे.

सूर्यकुमार रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये सहभागी झाला नव्हता, तसेच त्याने पुडुचेरीविरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती आधीच एमसीएला दिली होती. या वर्षाच्या सुरुवातीला विदर्भाविरुद्ध उपांत्य सामन्यात तो शेवटचा मुंबईकडून खेळला होता. दरम्यान, शिवम दुबेची विनंती मान्य करून एमसीएने त्यालाही आगामी रणजी सामन्यातून विश्रांती दिली आहे.

टी-२० कारकीर्दीत सूर्यकुमार यादवने ३३७ सामने खेळून ८,७७६ धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट १५२.८३ इतका प्रभावी आहे. भारतासाठी त्याने ९५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळून २,७५४ धावा केल्या आहेत. आक्रमक फलंदाजी, नेतृत्वगुण आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तो मुंबईसाठी या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

Bhagur Village: इंग्लंडला धडकी भरवणारं भारतातील 'ते' खोडकर गाव, जाणून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'भगूर'चा थरारक इतिहास

Canacona: गावडोंगरी-काणकोण येथे काटेकणगांची लागवड, कंदमुळांकडे शेतकऱ्यांचा कल; यंदा 250 टनहून अधिक उत्पादनाची शक्यता

SCROLL FOR NEXT