Election Commission Dainik Gomantak
देश

Election Commission Appointments: आयुक्तांच्या निवडीबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय केले बदल

Election Commission: गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या आयुक्ताचे पद वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

दैनिक गोमन्तक

Supreme Court on Election Commission Appointments: भारतात निवडणूक आयोग हे घटनात्मक आणि स्वतंत्र आयोग आहे. देशातील निवडणूका निष्पक्ष व्हाव्या, वेळेत व्हाव्यात आणि निवडणूका व्यवस्थित पार पडाव्यात आणि लोकशाही टिकून राहावी यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे.

असे असले तरीही गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या आयुक्ताचे पद वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. ही बाब लक्षात घेऊन सुप्रिम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या आयुक्ताच्या निवडचे निकष बदलले आहेत.

आता निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या निवडीसाठी समितीची स्थापना करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. पंतप्रधान, विरोधी गटनेता आणि सरन्यायाधीश यांचा निवडसमितीत समावेश असणार आहे.

संविधाना( Constitution)त केलेल्या तरतूदीनुसार राष्ट्रपती निवडणूक आयोगाच्या आयुक्ताची निवड करत होते. मात्र आता यामध्ये बदल दिसून येणार आहेत.

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक( Election ) आयोगाचे प्रमुख आहेत. भारतात, देश आणि राज्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ 6 वर्षांचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT