R Venkataramani Dainik Gomantak
देश

New Attorney General Of India: R Venkataramani बनले देशाचे नवे महाधिवक्ता

R Venkataramani: भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून ज्येष्ठ वकील आर वेंकटरामानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

New Attorney General of India: भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून ज्येष्ठ वकील आर वेंकटरामानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते या पदावर तीन वर्षे राहतील. केके वेणुगोपाल यांची जागा आर वेंकटरामानी घेणार आहेत. वेणुगोपाल यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. वेणुगोपाल (91 वर्षे) यांचा कार्यकाळ पहिल्यांदा 30 जून रोजी संपणार होता, मात्र केंद्र सरकारने ही मुदत तीन महिन्यांनी वाढवली होती. केके वेणुगोपाल यांना मोदी सरकारने तिसऱ्यांदा सेवेत मुदतवाढ दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्याकडे एजीची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रस्ताव पाठवला होता, परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही. अ‍ॅटर्नी जनरल हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी आणि केंद्र सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात.

तसेच, ते सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व करतात. याशिवाय, राष्ट्रपती कोणत्याही कायदेशीर किंवा घटनात्मक मुद्द्यावर अ‍ॅटर्नी जनरलचा सल्ला घेऊ शकतात. कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांच्या कार्यालयाने ट्विट करुन या नियुक्तीची पुष्टी केली. त्यांच्या कार्यालयाच्या वतीने लेखी, माननीय अध्यक्ष, श्री आर. वेंकटरामणी, 1 ऑक्टोबर 2022 पासून भारताचे अ‍ॅटर्नी जनरल पदी नियुक्त.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT