नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनच्या (Monsoon) भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.  Dainik Gomantak
देश

Monsoon Update: देशातून मॉन्सूनच्या एग्झिटला सुरुवात

पुढील चार दिवसांच राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि गुजरातसह मध्य प्रदेशातील काही भागातून मॉन्सूनची (Monsoon) एग्झिट (Exit) होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनच्या (Monsoon) भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. राजस्थान (Rajasthan) आणि गुजरातमधून (Gujarat) मॉन्सूनची एग्झिट (Exit) झाली आहे. तसेच उत्तर भारतातून देखील त्याचा परतीचा प्रवास लवकरच होण्याचा अंदाज आहे.

यंदा 13 जुलैला राजस्थानसह संपुर्ण भारतात व्यापल्यानंतर मॉन्सूनचा 2 महिने 24 दिवस त्याचा मुक्काम होता. आता मात्र त्याने परतीची वाट धरली आहे. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार 17 सप्टेंबर रोजीच मॉन्सूनची एग्झिट होणे अपेक्षीत होते. परंतु यंदा तो 19 दिवस उशीराने माघारी फिरत आहे.

पश्चिम राजस्थान, गुजरातमध्ये पावसाने उघडीप दिली आहे. आर्द्रता देखील कमी झाली आहे. तसेच वाऱ्यांची दिशा देखील बदलली असल्याने मॉन्सूने एग्झिट घेतल्याचे सांगितले आहे. राजस्थानच्या बिकानेर, जोधपूर, जालोर आणि भूजपर्यंतच्या भागामधून मॉन्सून परतला आहे. देशाच्या आणखी काही भागातून देखील मॉन्सूनची एग्झिट सुरु झाली आहे. पुढील चार दिवसांच राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि गुजरातसह मध्य प्रदेशातील काही भागातून मॉन्सूनची एग्झिट होऊ शकते. अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT