Ratan Tata Dainik Gomantak
देश

रतन टाटांना आसामचा सर्वोच्च राज्य नागरी पुरस्कार प्रदान

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Chief Minister Himanta Biswa Sarma) यांनी उद्योगपती रतन टाटा यांना असम वैभव सर्वोच्च राज्य नागरी पुरस्कार प्रदान केला आहे.

दैनिक गोमन्तक

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी उद्योगपती रतन टाटा यांना त्यांच्या घरी जाऊन राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'आसाम वैभव' देऊन सन्मानित केले. रतन टाटा (Ratan Tata) यांना यापूर्वी 24 जानेवारी रोजी गुवाहाटीमध्ये राज्य सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा सन्मान देण्यात येणार होता. मात्र, वैयक्तिक कारणामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

दरम्यान, आसाम सरकारने आपल्या सर्वोच्च सन्मानासाठी विविध क्षेत्रातील 19 जणांची निवड केली होती. यामध्ये कोरोना-19 फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपासून ते उद्योजकापर्यंत होते. उद्योगपती रतन टाटा यांना राज्याच्या नवनिर्मित सर्वोच्च नागरी पुरस्कार 'आसाम वैभव' ने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर आणखी पाच जणांना 'आसाम सौरव' आणि 12 जणांना 'आसाम गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुढील वर्षीपासून नागरिकांच्या शिफारशींवरुन पुरस्कार देण्यात येणार

या पुरस्कारांबाबतच्या नियमानुसार आसाम वैभव हा सर्वोच्च सन्मान दरवर्षी केवळ एकाच व्यक्तीला दिला जाणार आहे. त्याचबरोबर असम सौरव तीन जणांना आणि आसाम गौरव 15 जणांना देण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण 19 जणांचा गौरव करण्यात येणार आहे. मात्र, यंदा काही कारणांमुळे या संख्येत थोडासा बदल झाला आहे.

पुढील वर्षीपासून लोकांच्या शिफारशींच्या आधारे हे पुरस्कार दिले जातील. यासाठी राज्य सरकार लवकरच एक ऑनलाइन पोर्टल सुरु करणार आहे, जिथे लोक त्यांच्या आवडीच्या लोकांची नावे देऊ शकतील. दरवर्षी 2 डिसेंबर रोजी आसाम दिनानिमित्त हे सन्मान प्रदान केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT